शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

नोक-या मागणारे नव्हे, तर देणारे बना - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 03:17 IST

नोकरी मिळत नाही, म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो, अशी अगतिकता असू नये. प्रसंगी नोकरीतल्या संधी सोडेन, पण मी स्वत: नोकºया देणारा बनेन, स्वत:चा व्यवसाय उभारेन, अशी भावना असायला हवी.

मुंबई : नोकरी मिळत नाही, म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो, अशी अगतिकता असू नये. प्रसंगी नोकरीतल्या संधी सोडेन, पण मी स्वत: नोकºया देणारा बनेन, स्वत:चा व्यवसाय उभारेन, अशी भावना असायला हवी. खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल, असे वातावरण तयार करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे यायला हवे, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित आर्थिक जनतंत्र परिषद (इकॉनॉमिक डेमोक्रॅसी कॉन्क्लेव्ह)च्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्यासह ठाणे, पालघर आणि मुंबईतील मुद्रा योजना, दलित व्हेन्चर कॅपिटल, स्टार्ट अप अशा योजनांचा लाभ घेतलेले २०० यशस्वी उद्योजक उपस्थित होते. उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. उद्योग-व्यवसायातील छोट्या-मोठ्या संधींचा लाभ घेत नोकºया देणारे बना. वंचित, शोषित वर्गातील काही युवक रिफायनरी, रुग्णालय, हॉटेल्स अशा व्यवसायांमध्ये स्वत:ला सिद्ध करून यशस्वी होत आहेत. ‘डिक्की’सारखी संस्था अशा तरुणांना मदतीचा हात देत आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशातील आर्थिक व सामाजिक समानता लोकशाहीला अधिक बळकट करेल, असा विश्वास व्यक्त केला. युवाशक्ती ही देशाची ताकद आहे. कल्पकता व नवनिर्माणाची दृष्टी असणाºया या युवाशक्तीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी स्टार्टअप, मुद्रा, कौशल्य विकास यासारख्या योजना महत्त्वपूर्ण आहेत. भारत युवा उद्योजकांचा देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार विनयसहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले,तर अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी आभार मानले.मी एक प्रशिक्षणार्थीविविध विषयांवर प्रशिक्षण घेण्यासाठी यापूर्वी मी १० ते १२ वेळा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आलो आहे. तुमच्यासारखाच एक प्रशिक्षणार्थी म्हणून दिवंगत प्रमोद महाजन आणि अन्य नेत्यांकडून प्रशिक्षण घेतले आहे.आज राष्ट्रपती म्हणून या संस्थेच्या आवारात आल्यानंतर अनेक आठवणी जाग्या झाल्या. मी या संस्थेस कुठे-कुठे भेट दिली, कसा राहिलो, कसा शिकत गेलो, हे सगळे आठवले, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.दोन दिवसांच्या मुंबई भेटीनंतर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले. राष्ट्रपतींना निरोप देण्यासाठी विमानतळावर राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुमित मलिक, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्याम लाल गोयल तसेच सैन्यदलाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद