शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

No Confidence Motion : लोकसभा... नव्हे ही तर आंध्र प्रदेशची विधानसभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 13:05 IST

लोकसभेत तेलगू देसमने अविश्वास दर्शक ठराव मांडून आज त्यावर चर्चेला सुरुवात झाली. तेलगू देसम पार्टीचे जयदेव गाला यांनी आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर आम्हा उर्वरित आंध्र प्रदेशावर कसा अन्याय होत आहे हा एकमेव पाढा त्यांनी सुमारे तासभर वाचून दाखवला.

नवी दिल्ली- लोकसभेत तेलगू देसमने अविश्वास दर्शक ठराव मांडून आज त्यावर चर्चेला सुरुवात झाली. तेलगू देसम पार्टीचे जयदेव गाला यांनी आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर आम्हा उर्वरित आंध्र प्रदेशावर कसा अन्याय होत आहे हा एकमेव पाढा त्यांनी सुमारे तासभर वाचून दाखवला. विशेष म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये सत्ताधारी किंवा इतर पक्षांनी बोलण्याऐवजी तेलंगण राष्ट्र समितीने सतत व्यत्यय आणला.

तेलंगणची निर्मिती करण्यासाठी आंध्र प्रदेशचे चुकीच्या पद्धतीने विभाजन झाले. बळाचा वापर करुन ते विधेयक मंजूर करुन घेतले. आमची फसवणूक झाली असा सूर गल्ला यांनी आपल्या भाषणामध्ये लावला. तेलंगण राष्ट्र समिती आणि तेलगू देसम पार्टीचे खासदार एकमेकांवर आरोप करत राहिले आणि इतर पक्षांकडे हे पाहात बसण्यापलिकडे काहीच राहिलं नाही. सभागृहात काही वेळ लोकसभेचं नेहमीचं वातावरण न राहाता विभाजनपूर्व आंध्र प्रदेशच्या विधानसभेसारखे वातावरण तयार झाले होते. गल्ला यांच्या विधानावर आक्षेप घेत तेलंगण राष्ट्र समितीच्या खासदारांनी वेलमध्येही यायला सुरुवात केली होती.

गल्ला यांनी दक्षिणेच्या चार राज्यांपैकी आपल्या राज्यावर सर्वात जास्त अन्याय झाला हे सांगताना पंतप्रधानांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले असे सांगितले. नव्या आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती बांधण्यासाठी केवळ 1500 कोटी रुपये दिले. इतक्या कमी पैशात राजधानी कशी बांधली जाऊ शकेल असा प्रश्न त्यांनी विचारला. पंतप्रधानांनी तेलगू तल्ली म्हणजे तेलगू मातेचे मी रक्षण करेन असे आश्वासन दिले होते, ते त्यांनी या चार वर्षांमध्ये पाळले नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. अविश्वास दर्शक ठराव हा सरकारच्या एकूण कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यांच संधी असते, तो मांडताना होणाऱ्या पहिल्या भाषणात सरकारला चारही बाजूंनी घेरले जाते. मात्र आज तेलगू देसमने केवळ आपल्या राज्याला विशेष दर्जा मिळावा यासाठीच सर्व ठराव मांडला असल्यामुळे गल्ला यांनी दुसऱ्या कोणत्याही मुद्द्याला स्पर्श केला नाही. त्यातही पूर्वीच्या केंद्र सरकारने आमची कशी फसवणूक केली हे सांगण्यातच बहुतांश वेळ घालवल्यामुळे त्यांना मोदी सरकारची कोंडी करता आलीच नाही. 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणTelanganaतेलंगणाAndhra Pradeshआंध्र प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस