शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

केजरीवालांचा गुजरातमधील गेम फसला; बडा आदिवासी सहकारी साथ सोडून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 18:01 IST

गुजरातमध्ये सध्या आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची सक्रियता खूप वाढली आहे. या वर्षात चार ते पाच वेळा गुजरातला भेट दिली आहे.

गुजरात निवडणुकीपूर्वी आपला मोठा झटका बसला आहे. गेल्या काही काळापासून आपगुजरातमध्ये ज्या सहकारी पक्षाच्या जोरावर निवडणुकीची तयारी करत आहे त्याच पक्षाने साथ सोडण्याची घोषणा केली आहे. भारतीय ट्रायबल पार्टीने आपसोबतची युती तोडली आहे. 

आपसोबत जर युती केली तर आमच्या पक्षाला मोठे नुकसान होईल. आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जाईल, असे कारण ट्रायबल पार्टीने दिले आहे. यामुळे आम्ही एकट्यानेच निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरु केली आहे. हा झटका अशासाठी मोठा आहे, कारण आप भाजपाविरोधात गुजरातमध्ये मोठ्या ताकदीने उतरण्याची तयारी करत आहे. यामुळे ट्रायबल पक्षाने सोडून जाणे तिथे अनेक समीकरणे बदलवून टाकणार आहे. 

गुजरातच्या १८२ पैकी २७ जागांवर आादिवासी समाजाचा प्रभाव आहे. या जागांवर जय-पराजय हा आदिवासी मतदारच घडवितात. यामुळे भाजपाच्या या व्होटबँकेला धक्का देण्यासाठी ट्रायबल पक्षाला सोबत घेण्याचा मोठा गेम अरविंद केजरीवाल यांनी खेळला होता. परंतू तो आता फसला आहे. निवडणुकीपूर्वीच ट्रायबल पक्षाने युती तोडली आहे. अद्याप आपकडून यावर कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. 

गुजरातमध्ये सध्या आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची सक्रियता खूप वाढली आहे. या वर्षात चार ते पाच वेळा गुजरातला भेट दिली आहे. प्रत्येक वेळी ते तिथल्या लोकांना वेगवेगळ्या हमी देत ​​आहेत. आरोग्य, वीज, शिक्षणावर त्यांनी ही आश्वासने दिली आहेत. काही दिवसांत गुजरातमध्येही 'आप'ची यात्रा सुरु होणार आहे, या यात्रेची सुरुवात मनीष सिसोदिया करणार आहेत. गुजरातमध्ये आता प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. यातच आज आपने आपल्या कार्यालयावर गुजरात पोलिसांनी छापा टाकल्याचा आरोप केला आहे. यावर गुजरात पोलिसांनी आम्हाला हे तुमच्याकडूनच कळल्याचे म्हटले आहे. गुजरात पोलीस तासभर शोधाशोध करत होते, त्यांना काही सापडले नाही म्हणून ते पुन्हा येणार असल्याचे धमकावून गेल्याचा आरोप आपने केला होता. 

गुजरातमधील जनतेकडून आम्हाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमध्ये 'आप'चे वादळ निर्माण झाले आहे. दिल्लीनंतर आता गुजरातमध्येही छापेमारी सुरू केली आहे. दिल्लीत काही सापडले नाही, गुजरातमध्येही काही सापडले नाही. आम्ही कट्टर प्रामाणिक आणि देशभक्त लोक आहोत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपGujaratगुजरात