शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

बॉम्बची खोटी माहिती दिल्यास १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड, विमान कंपन्यांना मिळणाऱ्या धमक्यांनंतर केंद्राचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:53 IST

New Aviation Rules: या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचे आर्थिक नुकसान झाले. सोबतच प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. त्यानुसार, ९ डिसेंबरनंतर कोणत्याही विमान कंपनीत बॉम्बची खोटी माहिती देणाऱ्याला १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

२०२४ या एका वर्षात १ हजाराहून अधिक वेळा खोट्या धमक्या दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचे आर्थिक नुकसान झाले. सोबतच प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारने मोठा दंड आकारण्याची तयारी केली आहे.

बॉम्बच्या खोट्या धमक्या दिल्याप्रकरणी दोषी आढळल्यास, अनेक गंभीर गुन्हेगारी आरोपांसह १ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच, अशा कारवायांमध्ये सहभागी असलेल्या संघटनांवर शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. छोट्या संघटनांना  ५० लाख रुपये, मध्यम संघटनांना ७५ लाख रुपये, तर मोठ्या संघटनांना १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

केंद्र सरकारने सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी ब्युरोला अधिकार दिले आहेत की, सुरक्षेचे धोके लक्षात घेऊन ते कोणत्याही प्रवाशाला विमानात प्रवेश करण्यापासून रोखू शकतात. यासोबतच, एखादा प्रवासी चुकीची माहिती देऊन विमानात बसलेल्या लोकांना समस्या निर्माण करतो आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करतो किंवा पायलटला त्रास देतो. अशा स्थितीत त्या प्रवाशावर कारवाई होऊ शकते.

सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण ९९४ घटनांची नोंद झाली आहे. तर ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत धमक्यांचे एकूण ११४३ गुन्हे दाखल झाले आहेत. आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. ही आकडेवारी वाढण्यामागचे कारण म्हणजे सोशल मीडियावरून दिला जाणाऱ्या धमक्या आहेत. ज्या नंतर डिलिट केल्या जातात.

टॅग्स :airplaneविमानCrime Newsगुन्हेगारी