शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही नेहरूंची हिमालयापेक्षा मोठी चूक - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 4:44 AM

काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची हिमालयापेक्षा मोठी चूक होती, असे मत गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची हिमालयापेक्षा मोठी चूक होती, असे मत गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे. तथापि, काश्मीरमध्ये निर्बंध आहेत कुठे? ते तर तुमच्या मनात आहेत, असा टोला अमित शहा यांनी ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना रविवारी लगावला आहे.३७० कलम रद्द करण्याचा निर्णय व काश्मीर या विषयावर माजी सनदी अधिकाऱ्यांच्या संकल्प या संस्थेने दिल्लीतील नेहरू स्मृती वस्तुसंग्रहालय व ग्रंथालयामध्ये आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. संकल्प ही रा. स्व. संघ परिवारातील एक संघटना आहे. अमित शहा म्हणाले की, दोन्ही देशाशी संबंधित प्रश्नावर संयुक्त राष्ट्रात जाण्याचा नेहरु यांचा व्यक्तीगत निर्णय चूकच होती. तेथेही काश्मिर वादग्रस्त क्षेत्रासारखे सादर करण्यात आले. देशाच्या या भागाला पाकिस्तानकडून कब्जा केल्या गेल्याच्या स्वरुपात मांडले असते तर आज याच्या मालकीहक्कावरुन वाद झाला नसता. अमित शहा म्हणाले की, काश्मीरमध्ये निर्बंध असल्याची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीरचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळला. हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेणे ही हिमालयापेक्षा मोठी चूक होती. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे, तसेच जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देणे हे अतिशय योग्य निर्णय आहेत.काश्मीरमध्ये लाचलुचपतविरोधी विभागअमित शहा म्हणाले की, ३७० कलमामुळे बालविवाहविरोधी कायदा काश्मीरमध्ये लागू करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे तिथे आठ-दहा वर्षांच्या मुलींचे विवाहही बिनदिक्कतपणे करण्यात येत. ३७० कलमामुळे १०६ केंद्रीय कायदे काश्मीरमध्ये लागू करता येत नव्हते. हे कलम रद्द केल्यानंतरच काश्मीरमध्ये लाचलुचपतविरोधी विभाग स्थापन करणे शक्य झाले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शहाJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू