उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 09:48 IST2025-09-07T09:46:09+5:302025-09-07T09:48:43+5:30
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीए खासदारांसाठी आयोजित करण्यात आलेली डिनर पार्टी रद्द करण्यात आली आहे. उत्तर भारतातील पूर परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूकपूर्वी पंतप्रधान मोदींच्या अधिकृत निवासस्थानी एनडीए खासदारांसाठी डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, आता ही पार्टी रद्द करण्यात आली आहे.
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी डिनर पार्टी आयोजित करण्यात येणार होती. डिनर पार्टी एक प्रकारे उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए नेत्यांची बैठक होती. पण आता ती रद्द करण्यात आली आहे आणि त्यामागील कारणही समोर आले आहे.
डिनर पार्टी का रद्द करण्यात आली?
उत्तर भारतातील अनेक राज्ये सध्या भीषण पुराच्या विळख्यात सापडली असल्याने, ही डिनर पार्टी रद्द करण्यात आली आहे. सध्या पंजाबमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. या आपत्तीजनक परिस्थिती लक्षात घेता, डिनर पार्टी रद्द करण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांसाठी डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती. तीही रद्द करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या अनेक भागात मान्सूनमुळे झालेल्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी संततधार पाऊस, ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पूरग्रस्त भागातील लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर त्यांनी पोस्ट केली. "या वर्षी मान्सूनमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तींबद्दल जाणून घेतल्यानंतर, मला दुःख होते, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. ढगफुटी आणि मैदानी भागात आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे, यामुळे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, आसाम आणि देशाच्या इतर अनेक भागांमध्ये मृत्यू आणि विध्वंस झाला आहे.