शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

देशाची राजधानी संकटात; हरियाणातून यमुनेत सोडले तब्बल 8.7 लाख क्युसेक पुराचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 11:39 AM

गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांना पुराचा फटका सहन करावा लागला आहे.

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या 70 वर्षातील सर्वात मोठा महापूर आणि उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे नद्या नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दोन्ही राज्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे 31 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक बेपत्ता आहेत. या राज्यांतील पाणी आता दिल्लीलाही वेढण्याची शक्यता असून यमुना नदीतून गेल्या 40 वर्षांतील सर्वाधिक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे देशाची राजधानी पुराच्या पाण्यात जाण्याची स्थिती निर्मान झाली आहे. 

गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांना पुराचा फटका सहन करावा लागला आहे. यातच केरळ, आसाममध्येही महापुराची स्थिती आहे. येथील पूर ओसरतो न ओसरतो तोच उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार अतिवृष्टी होत आहे. यमुना नदीची पातळी वाढल्याने हरियाणाच्या हथिनीकुंड डॅममधून रविवारी तब्बल 8.72 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोमवारी सायंकाळपर्यंत दिल्लीला पोहोचण्याची शक्यता आहे. याआधी 1978 मध्ये पुरामुळे हरियाणातून 7 लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. काल सोडलेले पाणी जवळपास 2 लाख क्युसेकनी जास्त आहे. 

एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची स्थिती असून दिल्ली सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. तसेच खालील भागातील लोकांना हलविण्यात आले आहे. यामध्ये सोनिया विहार, गीता कॉलनी, मयूर विहार, डीएनडी, यमुना बाजार, काश्मीरी गेट, वजीराबाद, लोहे का पूल, आयटीओ ओखला, जामिया आणि जैतपूर हे भाग सहभागी आहेत. येथील लोकांना सुरक्षित स्थळी तंबूंमध्ये आसरा देण्यात आला आहे. सध्या 1100 तंबू लावण्यात आले असून जवळपास 5 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 

मनाली आणि कुल्लूदरम्यान असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. शिमल्यात आरटीओ कार्यालयाजवळ भूस्खलन होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वातावरणत बदल होत असल्याने हवामान खात्याने हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. जोरदार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

टॅग्स :floodपूरdelhiदिल्लीHimachal Pradeshहिमाचल प्रदेश