शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

पत्र लिहिण्यास कारण की...; नरेंद्र मोदींचं इमरान खान यांना उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 12:10 PM

जनतेचा विकास करणे हे भारताचं प्राधान्य आहे. पाकिस्तान वारंवार भारताला चर्चेसाठी आमंत्रित करत आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान आणि परराष्ट्र मंत्री एफ.एम कुरेशी यांच्या अभिनंदन पत्राचं उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इमरान खान यांना पत्र लिहून दहशतवादाच्या मुद्द्याचा उल्लेख केला आहे. दोन्ही देशामध्ये अनुकूल वातावरण बनविण्याचा पुनर्विचार व्हायला हवा. मात्र दहशतवादाचा मार्ग सोडल्यानंतरच हे शक्य आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात लिहिलं आहे. 

नरेंद्र मोदी यांनी इमरान खान यांना पत्र लिहिलं असलं तरी या पत्रात दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशात चर्चा कधी केली जाणार याचा उल्लेख करण्यात आला नाही. पत्रात नमूद केलं आहे की, भारताला आपल्या शेजारील राष्ट्राशी चांगले संबंध बनविण्याची इच्छा आहे. देशाच्या विकासासाठी शांती स्थिरता गरजेची आहे. जनतेचा विकास करणे हे भारताचं प्राधान्य आहे. पाकिस्तान वारंवार भारताला चर्चेसाठी आमंत्रित करत आहे. मात्र जोवर दहशतवादावर पाकिस्तानकडून ठोस कारवाई केली जात नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

काही दिवसांपूर्वी बिश्केक येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. चीनच्या पुढाकाराने झालेल्या ही बैठक आशियासाठी महत्त्वाची होती. पाकिस्तानलाही तिचे आमंत्रण होते. लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान प्रथमच एकाच व्यासपीठावर आले होते. नेहमीचे नाट्यतंत्र वापरून मोदी इमरान खानबरोबर गळाभेट करतील, अशी अनेकांची अपेक्षा होती. निदान हस्तांदोलन करतील, याची खात्री होती. २०१५मध्ये मोदींनी अचानक लाहोर येथे विमान उतरवून त्या वेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. तसेच काही या वेळी होईल, असे वाटत होते; पण ती अपेक्षा पुरी झाली नाही. गळाभेट दूर राहो, मोदींनी इमरान खान यांच्याशी हस्तांदोलनही केले नाही. परिषद समाप्त होत असताना मोदी व इमरान खान एकमेकांशी सौजन्याचे चार शब्द बोलले, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले. भारताने त्याला दुजोरा दिला नाही. 

बिश्केकमध्ये पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. सर्वच मानवतावादी शक्तींनी या दहशतवादाशी निपटण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या देशांचं फंडिंग बंद केलं पाहिजे, असंही मोदी म्हणाले होते.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान