शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नरेंद्र मोदी स्वातंत्र्यानंतर भारताला लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान - कॅप्टन अमरिंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 8:50 AM

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे.

ठळक मुद्देपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे.नरेंद्र मोदींनी कर्जमाफी, 1984 दंगल आणि इतर मुद्द्यांवरुन काँग्रेसला टार्गेट केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी हे वक्तव्य केले आहे.अमरिंदर सिंग यांनी नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने निवडून द्या सांगत लोकांना सामोरं जाणार आहेत असाच प्रत्येकजण विचार करतोय असंही म्हटलं आहे.

चंदीगढ - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी हे सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्जमाफी, 1984 दंगल आणि इतर मुद्द्यांवरुन काँग्रेसला टार्गेट केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी (4 जानेवारी) हे वक्तव्य केले आहे.

'गेल्या पाच वर्षांत आपण दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण करण्यात आलेलं एक आश्वासन सांगावं' असं  आव्हान कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. मोदींनी गुरुवारी गुरुदासपूर येथे घेतलेल्या प्रचारसभेचा उल्लेख करताना ‘नरेंद्र मोदी यांनी जुमले मारत तसेच धोका देत आणि मनाच्या गोष्टी सांगत देशाची पातळी खालावली आहे. लोकांनाही आपलं भलं व्हावं असं वाटत असल्यानेच त्यांना सत्तेवरुन हटवण्याच्या तयारीत आहेत’ असं सिंग यांनी म्हटले आहे. 

अमरिंदर सिंग यांनी 'नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने निवडून द्या सांगत लोकांना सामोरं जाणार आहेत असाच प्रत्येकजण विचार करतोय' असंही म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचं म्हटलं. गुरुदासपूर येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की, ‘देशातील इतर राज्यांप्रमाणे काँग्रेसनेपंजाबमध्येही कर्जमाफीची घोषणा केली होती. पण दीड वर्षांनी काय परिस्थिती आहे सर्वांनाच माहीत आहे. काँग्रेसने भूतकाळात अशा लोकांचं कर्ज माफ केलं होतं जे शेतकरीच नव्हते. काँग्रेसने गरिबी हटवण्याच्या नावे अनेक दशकं देशाला लुटलं आणि आता कर्जमाफीच्या नावे तेच करत आहेत’.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबcongressकाँग्रेसBJPभाजपा