शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

आज निवडणुका झाल्यास देशात मोदींचीच सत्ता, पण महाराष्ट्रात भाजपाला बसणार धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 08:31 IST

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्वबळावर 300 हून अधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. 

नवी दिल्ली - 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्वबळावर 300 हून अधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती.  गेल्या वर्षभरात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक निर्णघ घेतले असून, त्या निर्णयांबाबत उलटसुटल प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासारख्या कायद्यावरून देशात असंतोष असल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज देशात लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचीच सत्ता येईल, असा अंदाज एबीपी आणि सी-व्होटरच्या सर्व्हेने वर्तवला आहे. तर महाराष्ट्रात मात्र भाजपाला धक्का बसणार आहे. 

आजच्या घडीचा देशातील कल जाणून घेण्यासाठी एबीपी-सीव्होटरने लोकसभेच्या 543 मतदारसंघातील 30  हजार 240 लोकांशी चर्चा करून माहिती घेतली आहे. या सर्व्हेनुसार आज निवडणूक झाली तर मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला 330 जागा मिळतील. 2019 च्या तुलनेत आज निवडणूक झाल्यास एनडीएला 23 जागांचे नुकसान होणार आहे.  तर यूपीएला 130 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. 2019 च्या तुलनेत यूपीएला 34 जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर इतर पक्षांना 83 जागा मिळणार आहेत. 

Mann Ki Baat: हिंसा कुठल्याही समस्येवरचा उपाय नाही - नरेंद्र मोदीRepublic Day 2020: प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडली ४८ वर्षाची 'ही' परंपराअर्थसंकल्पाआधी मोदी सरकारसाठी आणखी एक वाईट बातमी; देशाची चिंता वाढणार

या सर्व्हेमधून मोदी सरकारच्या कामगिरीविषयी विचारणा केली असता सुमारे 56 टक्के लोकांनी मोदींच्या कामगिरीवर खूप समाधानी असल्याचे सांगितले. तर 24 टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले. 20 टक्के लोकांनी मात्र मोदी सरकारच्या कामगिरीवर असमाधानी असल्याचे मत नोंदवले. 

देशात मोदींचीच हवा असली तरी  महाराष्ट्रात मात्र वेगळे चित्र दिसत आहे.  राज्यात अस्तिवात आलेल्या महाविकास आघाडीचा फटका भाजपाला बसणार आहे. त्यामुळे आज निवडणूक झाल्यासा भाजपाला केवळ 21 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर महाविकास आघाडी आणि इतर पक्षांना मिळून 27 जागा मिळतील. आज निवडणूक झाल्यास कुणाला किती जागा मिळतील? एनडीए - 330 जागायूपीए - 130इतर पक्ष 83  गेल्या काही काळात विविध राज्यांमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता देशात कायम आहे. देशातील बहुतांश लोकांची पंतप्रधानपदासाठी अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पसंती असल्याचे सर्व्हेमधून समोर आले आहे. या सर्व्हेनुसार सुमारे 70 टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दिली आहे. तर 25 टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. तर 5 टक्के मतदारांनी दोघांपैकी एकालाही पसंती दिलेली नाही.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूकcongressकाँग्रेस