शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

Exclusive: मोदींनी प्रश्न टाळले, पण मोठे संकेत दिले!; शपथविधीचा मुहूर्त ठरला?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 4:45 AM

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत एकही प्रश्न उत्तरासाठी घेतला ...

- हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत एकही प्रश्न उत्तरासाठी घेतला नाही; परंतु २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर काय काय होणार याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्या संकेतांनुसार ते २५ मे रोजी ते पंतप्रधानपदाची शपथ घेतील.केंद्रात भाजप स्वत:च्या बहुमतावर सरकारची स्थापना करील, असा दावा करताना मोदी यांनी त्यांचे सरकार अजिबात वेळ न दवडता होईल तेवढ्या लवकर कामाला सुरुवात करील, असे संकेत दिले. १६ मे, २०१४ रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी त्यांनी १० दिवस घेतले होते.यंदा मोदी यांना जिंकण्याचा आत्मविश्वास असून, पुढील सरकारच्या योजना आणि १०० दिवसांची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला, तर मोदी त्यांचा ‘मन की बात’ हा दर महिन्याचा आकाशवाणीवरील कार्यक्रम २६ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू करतील. अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, मोदी हे बहुमतापासून थोडेसे दूर राहिले, तर २५ मे रोजी पदाची शपथ डामडौल न करता घेतील व ‘मन की बात’ही करतील. मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रम गेल्या मार्च महिन्यात स्थगित केला होता व तेव्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा तो सुरू करण्याचे आश्वासनही दिले होते.

ल्युटेन्स दिल्ली आणि खान मार्केट टोळीच्या कारवायांची मोदी यांना आता पूर्ण ओळख झाली असून, गेल्या पाच वर्षांत त्यांनी त्या सगळ्यांना यशस्वी तोंड दिले आहे. ते आता सरकार स्थापन करण्यास अजिबात विलंब लावणार नाहीत. भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल किंवा नाही. मिळाले तरीही राष्ट्रपती मोदी यांना २४ मे रोजी १७ वी लोकसभा अधिसूचित होताच सर्वात मोठ्या पक्षाचे नेते म्हणून सरकार स्थापन करण्यास बोलावतील.भाजपध्यक्ष अमित शहा यांनी भाजपेतर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेल्या पक्षांना रालोआच्या कार्यक्रम पत्रिकेवर विश्वास असेल, तर रालोआमध्ये येण्याचे निमंत्रण देऊन ठेवलेले आहे. आमची दारे त्या सगळ्यांसाठी उघडी आहेत, असे ते म्हणाले.

खासदारांना आदेशनिवडणूक लढवलेल्या भाजपच्या खासदारांनी त्यांचा विजय जाहीर झाल्यावर निवडणूक अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र घेऊन २४ मे रोजी राजधानीत परत यावे, असे भाजपने त्यांना कळवले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा