शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत?; ममता बॅनर्जींनी केला सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 15:44 IST

नरेंद्र मोदी भारताची तुलना वारंवार पाकिस्तानशी करत असतात

ठळक मुद्देभारत हा एक मोठा देश आहे, ज्याची संस्कृती आणि वारसा समृद्ध आहेआपण आमच्या देशाची तुलना पाकिस्तानबरोबर वारंवार का करता?पंतप्रधान मोदींना भारताचा विसर पडला आहे

सिलीगुडी - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भारत एक मोठा देश आहे. देशाची संस्कृती आणि वारसा समृद्ध आहे. तुम्ही भारताची तुलना पाकिस्तानशी वारंवार का करता? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी मोदींना केला आहे. सिलीगुडी येथील रॅलीत त्या बोलत होत्या. 

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत? तुम्ही प्रत्येक प्रकरणात पाकिस्तानचा गौरव कशाला करता? देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी आम्हाला नागरिकत्व सिद्ध करावं लागणं हे लज्जास्पद आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच नरेंद्र मोदी भारताची तुलना वारंवार पाकिस्तानशी करत असतात. प्रत्येक मुद्द्यात पाकिस्तानचा उल्लेख करत असतात. केंद्र सरकारने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी एनआरसी प्रक्रिया पुढे आणली आहे. भाजपा नेत्यांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे. एकीकडे पंतप्रधान सांगतात एनआरसी लागू केली जाणार नाही तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा दावा करतात की, संपूर्ण देशभरात एनआरसी प्रक्रिया लागू करणार आहे. पंतप्रधान मोदींना भारताचा विसर पडला आहे म्हणून वारंवार पाकिस्तानच्या गोष्टी बोलण्याची गरज त्यांना भासते असा टोला ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. आसाममध्ये राबविण्यात येणारी एनआरसी योजना तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पुरूलिया येथे सोमवारी (30 डिसेंबर) एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीही जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच भाजपाला एकटे पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. 'तुम्ही केवळ मतदान यादीत आपले नाव अचूक आहे की नाही याची खात्री करा, आम्ही एकाही व्यक्तीला देशाबाहेर काढू देणार नाही, हे आमचं वचन आहे' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपा