शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
2
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
3
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
4
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
5
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
6
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
7
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
8
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
9
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
10
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
11
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
12
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
13
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
14
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
15
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
16
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
17
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
18
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
19
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
20
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत?; ममता बॅनर्जींनी केला सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 15:44 IST

नरेंद्र मोदी भारताची तुलना वारंवार पाकिस्तानशी करत असतात

ठळक मुद्देभारत हा एक मोठा देश आहे, ज्याची संस्कृती आणि वारसा समृद्ध आहेआपण आमच्या देशाची तुलना पाकिस्तानबरोबर वारंवार का करता?पंतप्रधान मोदींना भारताचा विसर पडला आहे

सिलीगुडी - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भारत एक मोठा देश आहे. देशाची संस्कृती आणि वारसा समृद्ध आहे. तुम्ही भारताची तुलना पाकिस्तानशी वारंवार का करता? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी मोदींना केला आहे. सिलीगुडी येथील रॅलीत त्या बोलत होत्या. 

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत? तुम्ही प्रत्येक प्रकरणात पाकिस्तानचा गौरव कशाला करता? देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी आम्हाला नागरिकत्व सिद्ध करावं लागणं हे लज्जास्पद आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच नरेंद्र मोदी भारताची तुलना वारंवार पाकिस्तानशी करत असतात. प्रत्येक मुद्द्यात पाकिस्तानचा उल्लेख करत असतात. केंद्र सरकारने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी एनआरसी प्रक्रिया पुढे आणली आहे. भाजपा नेत्यांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे. एकीकडे पंतप्रधान सांगतात एनआरसी लागू केली जाणार नाही तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा दावा करतात की, संपूर्ण देशभरात एनआरसी प्रक्रिया लागू करणार आहे. पंतप्रधान मोदींना भारताचा विसर पडला आहे म्हणून वारंवार पाकिस्तानच्या गोष्टी बोलण्याची गरज त्यांना भासते असा टोला ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. आसाममध्ये राबविण्यात येणारी एनआरसी योजना तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पुरूलिया येथे सोमवारी (30 डिसेंबर) एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीही जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच भाजपाला एकटे पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. 'तुम्ही केवळ मतदान यादीत आपले नाव अचूक आहे की नाही याची खात्री करा, आम्ही एकाही व्यक्तीला देशाबाहेर काढू देणार नाही, हे आमचं वचन आहे' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपा