शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत?; ममता बॅनर्जींनी केला सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 15:44 IST

नरेंद्र मोदी भारताची तुलना वारंवार पाकिस्तानशी करत असतात

ठळक मुद्देभारत हा एक मोठा देश आहे, ज्याची संस्कृती आणि वारसा समृद्ध आहेआपण आमच्या देशाची तुलना पाकिस्तानबरोबर वारंवार का करता?पंतप्रधान मोदींना भारताचा विसर पडला आहे

सिलीगुडी - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भारत एक मोठा देश आहे. देशाची संस्कृती आणि वारसा समृद्ध आहे. तुम्ही भारताची तुलना पाकिस्तानशी वारंवार का करता? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी मोदींना केला आहे. सिलीगुडी येथील रॅलीत त्या बोलत होत्या. 

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत? तुम्ही प्रत्येक प्रकरणात पाकिस्तानचा गौरव कशाला करता? देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी आम्हाला नागरिकत्व सिद्ध करावं लागणं हे लज्जास्पद आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच नरेंद्र मोदी भारताची तुलना वारंवार पाकिस्तानशी करत असतात. प्रत्येक मुद्द्यात पाकिस्तानचा उल्लेख करत असतात. केंद्र सरकारने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी एनआरसी प्रक्रिया पुढे आणली आहे. भाजपा नेत्यांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे. एकीकडे पंतप्रधान सांगतात एनआरसी लागू केली जाणार नाही तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा दावा करतात की, संपूर्ण देशभरात एनआरसी प्रक्रिया लागू करणार आहे. पंतप्रधान मोदींना भारताचा विसर पडला आहे म्हणून वारंवार पाकिस्तानच्या गोष्टी बोलण्याची गरज त्यांना भासते असा टोला ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. आसाममध्ये राबविण्यात येणारी एनआरसी योजना तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पुरूलिया येथे सोमवारी (30 डिसेंबर) एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीही जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच भाजपाला एकटे पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. 'तुम्ही केवळ मतदान यादीत आपले नाव अचूक आहे की नाही याची खात्री करा, आम्ही एकाही व्यक्तीला देशाबाहेर काढू देणार नाही, हे आमचं वचन आहे' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपा