शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

...त्या काळात माणसेच नव्हे, तर त्यांच्या विचारांनाही बंधक बनवलं, आणीबाणीवर मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 10:48 IST

आणीबाणीला 43 वर्षं उलटली असली तरी काँग्रेस सरकारला लागलेला हा डाग अद्यापही लोकांच्या मनात ठसठशीत आहे.

नवी दिल्ली- आणीबाणीला 43 वर्षं उलटली असली तरी काँग्रेस सरकारला लागलेला हा डाग अद्यापही लोकांच्या मनात ठसठशीत आहे. सत्ताधारी भाजपानंही आज देशभरात काळा दिवस पाळला आहे. विशेष म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीला काळा दिवस संबोधत त्यावर टीकाही केली आहे. आणीबाणीच्या दरम्यान माणसांनाच नव्हे, तर त्यांच्या विचारांनाही बंधक बनवण्यात आलं होतं. आणीबाणी हा देशासाठी काळा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळीच ट्विट करत 1975मधल्या आणीबाणीचा जाहीर निषेध नोंदवला आहे.ट्विटमध्ये ते लिहितात, त्या काळात राजकीय ताकद दाखवण्यासाठी जनतेला नव्हे, तर त्यांच्या विचारांनाही बंधक बनवण्यात आलं होतं. आणीबाणीचा ज्या महिला-पुरुषांनी विरोध केला त्यांच्या साहसाला माझा सलाम. 43 वर्षापूर्वी लागू केलेली आणीबाणी देश काळा दिवस म्हणून कायम लक्षात ठेवेल. आणीबाणीच्या काळात सर्वच संस्थांचं खच्चीकरण करण्यात आलं असून, भीतीचं वातावरण निर्माण केलं गेलं होतं. त्यावेळीचे वादग्रस्त निर्णय आणि अन्यायकारक आदेशांवर टीका करत मोदींनी लोकशाही मजबूत करण्याचंही जनतेला आवाहन केलं आहे. लिहिणे, चर्चा करणे, विचार व्यक्त करणे, प्रश्न विचारणे हे आपल्या लोकशाहीचे महत्त्वपूर्ण पैलू आहेत. कोणतीही शक्ती आपल्या संविधानाच्या मूलभूत सिद्धांतांना कमी करू शकत नाही, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाTwitterट्विटर