शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी 'नरसिंग वाराही ब्रिगेड'ची स्थापना; पवन कल्याण यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 17:46 IST

पवन कल्याण यांच्या घोषणेला भाजपचा पाठिंबा.

Pawan Kalyan Narasimha Varahi Brigade: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी 'नरसिंह वाराही विंग/ब्रिगेड' (Narasimha Varahi Brigade) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, त्यांचा पक्ष जनसेना आंध्र प्रदेश आणि तेलंगणात सनातन धर्माच्या रक्षणासाठी ही नरसिंह वाराही विंग स्थापन करत आहे. विशेष म्हणजे, त्यांना या कामासाठी भाजपची साथ मिळाली आहे.

'सनातनविरोधी पोस्ट खपवून घेणार नाही'याबाबत घोषणा करताना पवन कल्याण म्हणाले की, "हिंदू मंदिरांना भेटी देताना आणि सनातन धर्माचे पालन करताना काही मूल्ये जपली पाहिजेत. सनातन धर्माशिवाय देश तसाच राहणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सनातन हा केवळ देशासाठीच नव्हे, तर जगासाठी मार्गदर्शक प्रकाश आहे."

"सोशल मीडियावर हिंदू धर्म किंवा सनातन धर्माची खिल्ली उडवणारी कोणतीही पोस्ट यापुढे खपवून घेतली जाणार नाही. त्या दिशेने एक पाऊल म्हणून जनसेना पक्षाने सनातन धर्म संरक्षण ग्रुप किंवा नरसिंह वाराही विंगची स्थापना केली आहे. चर्च आणि मशिदीचा आदर केला पाहिजे. पण, सनातन धर्माविरुद्ध बोलून लोकांच्या भावना दुखावल्या तर त्याला शिक्षा होईल. मी एनडीए सरकारच्या वतीने नाही, तर जनसेनेच्या वतीने बोलत आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो, पण मला सनातन धर्माचे रक्षण करायचे आहे आणि त्यासाठी मी काम करणार आहे," अशी घोषणा पवन कल्याण यांनी केली.

पवन कल्याण यांना भाजपची साथपवन कल्याण यांच्या घोषणेवर भाजप नेते नलिन कोहली म्हणाले, "लोकांनी मर्यादा ओलांडल्या आहेत, सनातन धर्माविषयी वाटेल त्या गोष्टी बोलल्या जात आहेत. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री सनातनबद्दल काय म्हणाले, ते सर्वांनी ऐकले. त्यांनी सनातन धर्माची तुलना एका रोगाशी केली. फक्त सनातनलाच टार्गेट का? एखाद्याला सनातन धर्म बळकट करायचा असेल तर त्यात गैर काय?" असे म्हटले. 

टॅग्स :pawan kalyanपवन कल्याणAndhra Pradeshआंध्र प्रदेशHinduहिंदूBJPभाजपा