शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
4
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
5
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
6
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
7
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
8
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
9
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
10
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
11
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
12
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
13
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
14
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
15
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
16
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
17
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
18
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
19
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
20
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

फुलंब्रीत नगर परिषदऐवजी नगर पंचायत होणार

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

--------------------

--------------------
फुलंब्री : येथील मतदारसंख्या साडेतेरा हजार असताना लोकसंख्या केवळ साडेसोळा हजार दाखविल्याने नगर परिषद होण्याऐवजी नगर पंचायत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तहसील प्रशासनाने केलेल्या या अक्षम्य चुकीमुळे फुलंब्रीकर नगर परिषदेला मुकणार आहेत.
एक वर्षापूर्वी तत्कालीन आघाडी सरकारने तालुकास्तरावरील गावाला नगर परिषद किंवा नगर पंचायत करण्याचा निर्णय घेतला होता. तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने मंजूर करून त्यावर अंमलबजावणी करण्याचे काम सुरू झाले होते. शासनाच्या निर्णयानुसार तालुकास्तरावरील शहराची लोकसंख्या २५ हजारांपेक्षा जास्त असेल, तर त्या शहरात नगर परिषद करण्यात येईल, तसेच ज्या तालुकास्तरावरील शहराची लोकसंख्या दहा हजार ते २५ हजारांपर्यंत आहे, तेथे नगर पंचायत करण्यासंबंधी आदेश शासनाचे अव्वर सचिव एस.डी. आहेर यांनी पारित केले होते. त्यानुसार प्रत्येक तालुका स्तरावरील शहराची माहिती मागविण्यात आली होती.
फुलंब्री येथील तहसील कार्यालयाने याविषयी शहराची लोकसंख्या १६ हजार दाखविली. वास्तविक पाहता हा आकडा सर्रास खोटा आहे. साडेतेरा हजार मतदार असताना लोकसंख्या सोळा हजार कशी असू शकते? याबाबत संबंधित अधिकार्‍यांनाही वाटले नाही. तहसील कार्यालयाच्या या अक्षम्य चुकीमुळे फुलंब्रीत नगर परिषदऐवजी नगर पंचायत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तहसील प्रशासनाने पाठविलेला १६ हजार लोकसंख्येचा आकडा कोणत्या आधारावर पाठविला, याचा उलगडा झालेला नाही.
फुलंब्री शहरात सुमारे साडेआठ हजार कुटुंबे आहेत. त्यांच्याकडे स्वतंत्र रेशन कार्ड आहेत. शहराची लोकसंख्या ३० हजारांपर्यंत असताना ती कमी का दाखविण्यात आली? यामुळे येथे नगर परिषद होण्याची आशा मावळली आहे. तालुक्याचा विचार केला तर फुलंब्री तालुका औरंगाबाद शहराच्या इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वांत जवळचा आहे. येथे अनेक छोटे-मोठे उद्योग-व्यवसायात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे येथे नगर परिषद होणे आवश्यक आहे.
तक्रारी नोंदविल्या
दरम्यान, तहसील प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात सोळा हजार लोकसंख्या दाखविल्याने त्याच्या विरोधात अनेकांनी आक्षेप नोंदविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन देशमुख, पंचायत समितीचे उपसभापती रऊफ कुरेशी यांनी तक्रारी नोंदविल्या असताना जिल्हाधिकार्‍यांनी दखल दिली नाही.
नगर परिषदऐवजी नगर पंचायत झाली तर शहराचा विकास होणे शक्य होणार नाही. नगर पंचायतसंबंधी जिल्हाधिकारी स्तरावर कारवाई सुरू आहे. सुधारित लोकसंख्या पाठविण्याची तसदी घेतली तर अजूनही नगर परिषद होण्याचा मार्ग मोकळा आहे.