शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्री उत्सवसाठी मुर्डेश्वर संस्थान सज्ज

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

घाटनांद्रा : १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या मुर्डेश्वर संस्थान येथील सात दिवस चालणार्‍या यात्रौत्सवासाठी संस्थान सज्ज झाल्याची माहिती पीठाधीश काशीगिरी महाराजांनी दिली.

घाटनांद्रा : १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या मुर्डेश्वर संस्थान येथील सात दिवस चालणार्‍या यात्रौत्सवासाठी संस्थान सज्ज झाल्याची माहिती पीठाधीश काशीगिरी महाराजांनी दिली.
सिल्लोड तालुक्याचे कुलदैवत असलेल्या केळगाव येथील डोंगराच्या कडेवर असलेल्या मुर्डेश्वर संस्थानात परंपरेनुसार महाशिवरात्रीपासून सात दिवस मोठी यात्रा भरते. यावर्षी दि.१७ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या यात्रौत्सवासाठी संस्थानच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल ठेवण्यात आली आहे.
प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीस ऐतिहासिक महत्त्व असून, वनवासात जात असताना रामचंद्रांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून या शिवलिंगास अभिषेक केला होता. म्हणूनही या ठिकाणास धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणून आजही या ठिकाणी श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीस यात्रेचे स्वरूप येते. डोंगराच्या कडेवर हे हेमांडपंती पद्धतीचे बांधकाम केलेले मंदिर असून, मंदिराच्या बाजूस खान्देश प्रांताचे रोमांचक, नैसर्गिक सौंदर्य पाहावयास मिळते. म्हणून या ठिकाणी भाविकांबरोबर पर्यटकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे काशीगिरी महाराजांनी सांगितले.
वर्षभरात विविध धार्मिक उत्सव व अखंड हरिनामाची वीणा या ठिकाणी चालू राहते. यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने परिश्रम घेतात. शिवाय प्रत्येक दिवशी येणार्‍या भाविकास प्रसादाची नियमित व्यवस्था संस्थानाने भाविकांच्या माध्यमातून सुरू केलेली आहे.
दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात काशीगिरी महाराजांच्या हस्ते रुद्राभिषेक होऊन महाआरती, हरिपाठ, रात्री विविध ठिकाणांच्या महाराजांची प्रवचने व प्रसिद्ध कीर्तनकार महाजन महाराज यांचे कीर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
व्हॉलीबॉल, क्रिकेटच्या स्पर्धा, लोकनाट्य, तमाशा व करमणुकीचे कार्यक्रम ठेवण्यात आले असून, यात्रेत विविध प्रकारची महिलांच्या संसारोपयोगी साहित्याची व खेळणी, प्रसादाची दुकाने यात्रेची शोभा वाढवीत आहेत. भाविकांनी या यात्रेत सहभाग घेण्याचे आवाहन संस्थानचे पीठाधीश काशीगिरी महाराजांनी केले आहे.