शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

फ्लुरॉसिसच्या संकटावर खासदारांचे मौन

By admin | Updated: December 20, 2014 02:41 IST

महाराष्ट्रातील १९ जिल्हे फ्लुरॉसिसच्या संकटाशी सामना करीत असताना आणि त्यातील १२ जिल्ह्यांनी धोक्याची पातळी गाठली असूनही

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमहाराष्ट्रातील १९ जिल्हे फ्लुरॉसिसच्या संकटाशी सामना करीत असताना आणि त्यातील १२ जिल्ह्यांनी धोक्याची पातळी गाठली असूनही या विषयावरील चर्चेत महाराष्ट्रातील खासदारांनी शुक्रवारी लोकसभेत चिंताजनक मौन बाळगले. विशेष म्हणजे हा विषय शुक्रवारी लोकसभा सभागृहात पहिल्या क्रमांकाचा होता. राजस्थान, आंध्रच्या खासदारांनी फ्लुरॉसिस आजरांवरून केंद्र सरकारला धारेवर धरले, पण राज्यातील बरेच खासदार सभागृहात असूनही त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. महाराष्ट्रात ‘स्केलेटल’ व ‘डेंटल’ अशा दोन्ही फ्लुरॉसिसने नागरिक त्रस्त आहेत. संपूर्ण मराठवाडा, विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये ही समस्या उग्र आहे. नांदेड, हिंगोली, यवतमाळमध्ये कमालीचा उदे्रक आहे. माहूरजवळचे सावरखेड या गावात ७० टक्के गावकरी दाताच्या फ्लुरॉसिससने ग्रस्त आहेत. पिण्याच्या पाण्यातील फ्लोराइडचे प्रमाण तपासण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्याने हा प्रकार वाढतो आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय फ्लुरॉसिस नियंत्रण कार्यक्रम सुरू केला, पण त्याला पुरेसा निधी नसल्याने फक्त लोकांचे प्रबोधन होते. विशेष म्हणजे गेल्या वर्षी नांदेड येथून ‘लोकमत‘ने हा विषय मांडल्यावर केंद्र सरकारने राज्यातील दोन जिल्ह्यांऐवजी १२ जिल्ह्यांत राष्ट्रीय फ्ल्युरॉसिस नियंत्रण कार्यक्रम सुरू केला होता. देशात फ्लुरॉसिस बळावत असून, त्याला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकार कोणते उपाय योजत आहे, हा प्रश्न राजस्थान, आंध्रच्या खासदारांकडून विचारण्यात आला. आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी उत्तर दिले. राज्य व केंद्र सरकारने ठोस आर्थिक नियोजन करून हा या विषयाचा निपटारा केला पाहिजे, अशी कळकळ त्यांनी बोलून दाखविली. मागील तीन वर्षांचे आकडे त्यांनी दिले. सरकारने चिंता व्यक्त केली. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही सरकारने तोडगा काढलाच पाहिजे, अशी सूचना सरकारला केली. विशेष म्हणजे या वेळी सभागृहात उपस्थित असलेल्या महाराष्ट्रीतील एकाही खासदाराने या विषयात जराही रुची दाखविली नाही. अध्यक्षांनी परवानगी देऊन देखील महाराष्ट्रासाठी हा विषय गंभीर नाही, असे वाटून कोणीच दखल घेतली नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील डॉक्टर असलेले दोन खासदार देखील त्या वेळी उपस्थित होते. राजस्थानचे भाजपा सदस्य डॉ. मनोज राजोरिया यांनी मुद्दा पकडला आणि आरोग्यमंत्री नड्डा यांनी अध्यक्षांच्या परवानगीने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नड्डा यांनी राजस्थानसाठी वेगळी योजना राज्य सरकारला सोबत घेऊन केंद्र सुरू करेल, असे सांगावे लागले.