शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

"विनेश फोगटला हरवण्यासाठी..."; हरयाणात 'आप'च्या जखमेवर मालीवाल यांनी चोळले मीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:24 IST

Swati Maliwal : हरयाणा विधानसभा निवडणुकीत आपला अपयश मिळाल्यानंतर खासदार स्वाती मालीवाल यांनी जोरदार टीका केली आहे.

Haryana Assembly Results:हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या निकालाच्या कलापासून काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर भाजपने आघाडी घेतली. मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेसने मुसंडी मारली आहे. दुसरीकडे हरयाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हरयाणामध्ये आपचा सुपडा साफ होत असताना त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालवाल यांनी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. आप इंडिया आघाडीा विश्वासाचा विश्वासघात करत असल्याचे स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे.

हरयाणात मोठा विजय मिळवण्याच्या उद्देषाने निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. आपने हरयाणामध्ये ८९ जागांवर निवडणूक लढवली आहे. मात्र या निवडणुकीत त्यांना दोन टक्क्यांपेक्षा कमी मतं मिळाली. आपच्या या कामगिरीवर पक्षाच्या बंडखोर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी जखमेवर मीठ चोळण्याची संधी सोडली नाही. अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली आहे. स्वाती मालीवाल यांनी आप पक्षाच्या उमेदवारांना डिपॉझिटही वाचवता आलेलं नाही असं म्हटलं आहे. 

आम आदमी पक्षाने काँग्रेसची मते पळवल्याचा आरोप स्वाती मालीवाल यांनी केला आहे. "काँग्रेसचा बदला घेण्यासाठीच ते हरयाणात आले होते. माझ्यावर भाजपचा एजंट असल्याचा खोटा आरोप केला, आज ते स्वत: इंडिया आघाडीशी गद्दारी करत आहे आणि काँग्रेसची मते पळवत आहेत. हे सगळं सोडा, विनेश फोगटलाही हरवण्यासाठी यांनी उमेदवार उभा केला. आपल्याच राज्यात या लोकांना डिपॉझिट वाचवता येत नाही, अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे? अजूनही वेळ आहे, अहंकार सोडा, डोळ्यांवरील पडदा हटवा, नाटक करू नका आणि जनतेसाठी काम करा," अशी खोचक पोस्ट स्वाती मालीवाल यांनी केली आहे.

जामीनावर बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी हरयाणात जोरदार प्रचार केला होता. अरविंद केजरीवाल हे मूळचे हरयाणाचे असून ही बाब जनतेसमोर ठेवून त्यांनी मते मागितली होती. आमच्या पाठिंब्याशिवाय हरयाणात सरकार स्थापन होणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी अनेक वेळा केला. मात्र निवडणुकीचे चित्र स्पष्ट व्हायला लागल्यानंतर आपच्या उमेदवारांना हरयाणाच्या जनतेने साफ नाकारल्याचे दिसत आहे.

दरम्यान, हरयाणा निवडणुकीच्या आत्तापर्यंतच्या कलानुसार भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे. भाजप४७ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर आहे. जर भाजपकडे हीच आघाडी कायम राहिली तर राज्याच्या निवडणूक इतिहासातील ही पक्षाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असणार आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाAAPआपcongressकाँग्रेस