शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

CoronaVirus: उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; केंद्रीय मंत्र्याचे योगींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 19:17 IST

CoronaVirus: एका केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशमधील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट पत्र लिहिले आहे.

लखनऊ: संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये संसाधने मुबलक प्रमाणात असून, कोरोना नियंत्रणासाठी अनेकविध उपाययोजना केल्याचे योगी सरकार सांगत असले, तरी उत्तर प्रदेशातून केंद्रात मंत्री झालेल्या एका नेत्याने उत्तर प्रदेशमधील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट पत्र लिहिले आहे. (mp santosh gangwar wrote letter to cm yogi adityanath over health system in uttar pradesh)

उत्तर प्रदेशमधील बरेली येथून खासदार असलेले केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आरोग्य व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. बरेली येथील आरोग्य अधिकारी साधा फोनही उचलत नाहीत, अशी खंत गंगवार यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. कोरोनाची स्थिती बिकट आहे. रेफर करण्यात आलेल्या रुग्णांनाही सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. त्यांना परत पाठवले जाते. यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती खालावत आहे. रुग्णांना भरती करून उपचार करण्यात यावेत, असे गंगवार यांनी योगी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

“उपाययोजनेपेक्षा ठाकरे सरकारचं पब्लिसिटी स्टंट करण्यावर जास्त लक्ष”

बाजारमूल्यांपेक्षा अधिक किमतीने उपकरणे

कोरोना संकटाच्या काळात आवश्यक असलेली अनेक उपकरणे बाजार भावापेक्षा दीड पट अधिक किमतीने विकली जात आहेत. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच किमती निर्धारित केल्या पाहिजेत. याशिवाय कोरोना रुग्णालयात चांगल्या सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी गंगवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. 

दिलासा! २५ राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राकडून ८,९२३ कोटींचा निधी वितरीत

ऑक्सिजनची कमतरता

उत्तर प्रदेशातील बरेलीसह अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये शक्य तितक्या लवकर ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा. आयुषमान भारताशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरण तातडीने सुरू करण्यात यावे, अशा काही सूचनाही या पत्रात देण्यात आल्या आहेत. 

“राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOxygen Cylinderऑक्सिजनremdesivirरेमडेसिवीरUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण