शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

CoronaVirus: उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; केंद्रीय मंत्र्याचे योगींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 19:17 IST

CoronaVirus: एका केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशमधील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट पत्र लिहिले आहे.

लखनऊ: संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये संसाधने मुबलक प्रमाणात असून, कोरोना नियंत्रणासाठी अनेकविध उपाययोजना केल्याचे योगी सरकार सांगत असले, तरी उत्तर प्रदेशातून केंद्रात मंत्री झालेल्या एका नेत्याने उत्तर प्रदेशमधील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट पत्र लिहिले आहे. (mp santosh gangwar wrote letter to cm yogi adityanath over health system in uttar pradesh)

उत्तर प्रदेशमधील बरेली येथून खासदार असलेले केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आरोग्य व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. बरेली येथील आरोग्य अधिकारी साधा फोनही उचलत नाहीत, अशी खंत गंगवार यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. कोरोनाची स्थिती बिकट आहे. रेफर करण्यात आलेल्या रुग्णांनाही सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. त्यांना परत पाठवले जाते. यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती खालावत आहे. रुग्णांना भरती करून उपचार करण्यात यावेत, असे गंगवार यांनी योगी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

“उपाययोजनेपेक्षा ठाकरे सरकारचं पब्लिसिटी स्टंट करण्यावर जास्त लक्ष”

बाजारमूल्यांपेक्षा अधिक किमतीने उपकरणे

कोरोना संकटाच्या काळात आवश्यक असलेली अनेक उपकरणे बाजार भावापेक्षा दीड पट अधिक किमतीने विकली जात आहेत. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच किमती निर्धारित केल्या पाहिजेत. याशिवाय कोरोना रुग्णालयात चांगल्या सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी गंगवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. 

दिलासा! २५ राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राकडून ८,९२३ कोटींचा निधी वितरीत

ऑक्सिजनची कमतरता

उत्तर प्रदेशातील बरेलीसह अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये शक्य तितक्या लवकर ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा. आयुषमान भारताशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरण तातडीने सुरू करण्यात यावे, अशा काही सूचनाही या पत्रात देण्यात आल्या आहेत. 

“राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOxygen Cylinderऑक्सिजनremdesivirरेमडेसिवीरUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण