शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

वादळी पावसात वीज पडून 129 जणांचा मृत्यू, मोदींकडून शोक व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 9:56 AM

बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडाट सुरु होता. त्यातच, वीज पडून तब्बल 97 जणांचा जीव गेला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह वीज पडून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 129 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर, 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मृत नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही शोक व्यक्त केला असून नड्डा यांनी स्थानिक भाजापा कार्यकर्त्यांना पीडित कुटुंबीयांना मदत करण्याचं आवाहन केलंय. 

बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडाट सुरु होता. त्यातच, वीज पडून तब्बल 97 जणांचा जीव गेला आहे. तर, उत्तर प्रदेशातही 32 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वीज पडून अनेकांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. तेथील राज्य सरकार तत्परतेने मदत कार्यात सहभागी झाले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना असल्याचं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

संरक्षणमंत्री राजथानसिंह यांनीही ट्विट करुन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. या घटनेच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाल्याचं राजनाथसिंह यांनी म्हटलंय. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घनटनेतील पीडितांबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना मदत निधी म्हणून तात्काळ 4-4 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत करण्याचे सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार