शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

वादळी पावसात वीज पडून 129 जणांचा मृत्यू, मोदींकडून शोक व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 09:57 IST

बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडाट सुरु होता. त्यातच, वीज पडून तब्बल 97 जणांचा जीव गेला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह वीज पडून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 129 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर, 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मृत नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही शोक व्यक्त केला असून नड्डा यांनी स्थानिक भाजापा कार्यकर्त्यांना पीडित कुटुंबीयांना मदत करण्याचं आवाहन केलंय. 

बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडाट सुरु होता. त्यातच, वीज पडून तब्बल 97 जणांचा जीव गेला आहे. तर, उत्तर प्रदेशातही 32 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वीज पडून अनेकांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. तेथील राज्य सरकार तत्परतेने मदत कार्यात सहभागी झाले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना असल्याचं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

संरक्षणमंत्री राजथानसिंह यांनीही ट्विट करुन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. या घटनेच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाल्याचं राजनाथसिंह यांनी म्हटलंय. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घनटनेतील पीडितांबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना मदत निधी म्हणून तात्काळ 4-4 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत करण्याचे सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार