शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

वादळी पावसात वीज पडून 129 जणांचा मृत्यू, मोदींकडून शोक व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 09:57 IST

बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडाट सुरु होता. त्यातच, वीज पडून तब्बल 97 जणांचा जीव गेला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह वीज पडून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 129 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर, 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मृत नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही शोक व्यक्त केला असून नड्डा यांनी स्थानिक भाजापा कार्यकर्त्यांना पीडित कुटुंबीयांना मदत करण्याचं आवाहन केलंय. 

बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडाट सुरु होता. त्यातच, वीज पडून तब्बल 97 जणांचा जीव गेला आहे. तर, उत्तर प्रदेशातही 32 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वीज पडून अनेकांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. तेथील राज्य सरकार तत्परतेने मदत कार्यात सहभागी झाले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना असल्याचं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

संरक्षणमंत्री राजथानसिंह यांनीही ट्विट करुन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. या घटनेच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाल्याचं राजनाथसिंह यांनी म्हटलंय. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घनटनेतील पीडितांबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना मदत निधी म्हणून तात्काळ 4-4 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत करण्याचे सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार