शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसात वीज पडून 129 जणांचा मृत्यू, मोदींकडून शोक व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 09:57 IST

बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडाट सुरु होता. त्यातच, वीज पडून तब्बल 97 जणांचा जीव गेला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह वीज पडून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 129 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर, 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मृत नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही शोक व्यक्त केला असून नड्डा यांनी स्थानिक भाजापा कार्यकर्त्यांना पीडित कुटुंबीयांना मदत करण्याचं आवाहन केलंय. 

बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडाट सुरु होता. त्यातच, वीज पडून तब्बल 97 जणांचा जीव गेला आहे. तर, उत्तर प्रदेशातही 32 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वीज पडून अनेकांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. तेथील राज्य सरकार तत्परतेने मदत कार्यात सहभागी झाले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना असल्याचं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

संरक्षणमंत्री राजथानसिंह यांनीही ट्विट करुन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. या घटनेच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाल्याचं राजनाथसिंह यांनी म्हटलंय. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घनटनेतील पीडितांबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना मदत निधी म्हणून तात्काळ 4-4 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत करण्याचे सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार