शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

'मंत्री चेतन चौहान यांचा मृत्यू कोरोनामुळे नाही, तर हॉस्पीटलच्या निष्काळजीपणामुळे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 13:05 IST

चेतन चौहान यांना जुलै महिन्यात कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी, संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआय) मध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्देचेतन चौहान यांना रुग्णालयात दाखले केल्यानंतर डॉक्टर व स्टाफ तेथे आला होता. चेतन कोण? अशी विचारणाही त्या स्टाफने केली. त्यावेळी, चेतन यांनी हात वरुन करुन इशारा केला. मग, डॉक्टरांनी कोरोनाची लागण कशी झाली, याबद्दल विचारले.

लखनौ - भारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे 16 ऑगस्ट रोजी रविवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. चेतन चौहान यांना मागील महिन्यात कोरोनाचीही लागण झाली होती. पण, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. रविवारी त्यांचे  निधन झाल्याची माहिती त्यांचा भाऊ पुष्पेंद्र चौहान यांनी दिली. मात्र, केतन चौहान यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसून रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आमदार सुनिलसिंह साजन यांनी केला आहे. 

चेतन चौहान यांना जुलै महिन्यात कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी, संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआय) मध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती ढासळल्याने गुरूग्राम मधील मेदांता रुग्णालयात त्यांना शिफ्ट करण्यात आले. त्यातच, किडनी फेल झाल्यानंतर त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

याप्रकरणी, उत्तर प्रदेशातीलआमदार सुनिलसिंह सजन यांनी चेतन चौहान यांच्यावरील उपचारासंदर्भात रुग्णालय प्रशासनला जबाबदार धरले आहे. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे चौहान यांच्यावरील उपचार व्यवस्थीत झाले नसून रुग्णालय प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप सजन यांनी केला आहे. तसेच, रुग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफने त्यांना आदराची वागणूक दिली नसल्याचेही साजन यांनी म्हटलेय दरम्यानच्या काळात चौहान आणि मी एकाच वार्डमध्ये उपचार घेत होतो, असा दावाही त्यांनी केला आहे. रुग्णालयातील घडलेला एक प्रसंगही त्यांनी सांगितला आहे. 

चेतन चौहान यांना रुग्णालयात दाखले केल्यानंतर डॉक्टर व स्टाफ तेथे आला होता. चेतन कोण? अशी विचारणाही त्या स्टाफने केली. त्यावेळी, चेतन यांनी हात वरुन करुन इशारा केला. मग, डॉक्टरांनी कोरोनाची लागण कशी झाली, याबद्दल विचारले. तसेच, काय करता हेही विचारले. त्यावेळी, मी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रालयात मंत्री असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांच्या या वागण्यामुळे आपण त्यांच्यावर चिडलो आणि हे चेतन चौहान आहेत, ज्यांनी देशासाठी क्रिकेट खेळलंय, असं मी त्यांना सांगितल्याचं सुनिलसिंह यांनी म्हटले. त्यानंतर, डॉक्टरांनी ओह्रहह चेतन .. असे म्हणत ओळख दर्शवली व ते निघून गेले, असेही सिंह यांनी म्हटले. 

सुनिल सिंह यानी विधानपरिषदेत बोलताना रुग्णालया प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, चौहान यांनी 1969 ते 1978 या कालावधीत 40 कसोटी सामने खेळले. त्यांनी 31.57च्या सरासरीनं 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतकं आहेत. त्यांनी 13 वर्ष DDCAचे उपाध्यक्षपदही सांभाळले. त्यानंतर ते राजकारणात आले. कसोटी शिवाय त्यांनी 7 वन डे सामन्यांत 153 धावा ही केल्या. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. चेतन चौहान आणि सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावांची भागीदारी केली असून त्यांच्या नावावर 10 शतकी भागीदारी आहेत. 1979 साली कसोटीत त्यांनी ओव्हलवर 213 धावांची भागीदारी करून विजय मर्चंट आणि मुश्ताक अली यांचा 203 धावांचा विक्रम मोडला होता. कसोटीत 2000 हून अधिक धावा करूनही एकही शतक नावावर नसलेले ते एकमेव खेळाडू आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 179 सामन्यांत 40.22 च्या सरासरीनं 21 शतकं आणि 59 अर्धशतकांसह 11 हजार धावा केल्या.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीMLAआमदार