शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

“देश दोन हिंदूमध्ये विभागला गेलाय; एक मंदिरांमध्ये प्रवेश करु शकतो, दुसरा नाही”: मीरा कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 9:00 AM

धर्म बदलला तरी, जात बदलत नाही, असे सांगत माझे वडील धर्मपरिवर्तनाला नकार द्यायचे, असे मीरा कुमार यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील मंडळी आपल्या विधानांमुळे चर्चेत आली आहेत. अगदी बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतपासून (Kangana Ranaut) ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यापर्यंत अनेकांची विधाने गाजताना दिसत आहेत. यातच आता लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार (Meira Kumar) यांची भर पडली आहे. देश दोन हिंदूमध्ये विभागला गेला आहे. एक मंदिरांमध्ये प्रवेश करु शकतो, दुसरा नाही, असे मीरा कुमार यांनी म्हटले आहे. 

माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांच्या “द लाइट ऑफ एशिया:द पोएम दैट डिफाइंड बुद्धा” या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी आयोजित कार्यक्रमात मीरा कुमार बोलत होत्या. अनेकांनी माझ्या वडिलांना जातीय भेदभावामुळे हिंदू धर्म सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र, माझे वडील जगजीवन राम यांनी हिंदू धर्म सोडण्यास सपशेल नकार दिला होता. तसेच या चुकीच्या सामाजिक व्यवस्थेविरोधात लढा देण्याचा निर्धार त्यांनी केला, अशी आठवण मीरा कुमार यांनी यावेळी बोलताना सांगितली. 

२१ व्या शतकातही जाती व्यवस्था कायम

आजही २१ व्या शतकात जाती व्यवस्था कायम असल्याचे दिसून येते. आपला भारत देश दोन प्रकारच्या हिंदू समुदायांमध्ये विभागला गेला आहे. एक म्हणजे जो मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेऊ शकतो आणि दुसरा असा हिंदू समाज आहे, ज्याला अजूनही मंदिरांमध्ये प्रवेश नाकारला जातो, असे मीरा कुमार यांनी म्हटले आहे. तसेच धर्म बदला असा सल्ला देणाऱ्यांना वडील जगजीवन राम नेहमी विचारत असत की, धर्म बदलला म्हणून जात बदलणार आहे का, असेही मीरा कुमार यांनी सांगितले.

रस्ते चकचकीत झाले, मात्र विचार जुनेच आहेत

२१ व्या शतकात आपण आलो आहोत. अनेक गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल झालेले पाहायला मिळत आहेत. पायाभूत सुविधा सुधारताना दिसत आहेत. रस्ते चकचकीत झाले आहेत. मात्र, आपले विचार कधी चकचकीत होणार असा सवाल करत आजही पुजारी माझ्या गोत्राबाबत विचारणा करतात, तेव्हा त्यांना सांगते की, माझे संगोपन अशा वातावरणात झाले आहे, जिथे जात-पात मानली जात नाही. विविध धर्मांतील चांगल्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे, स्विकारल्या पाहिजेत आणि तोच आपला वारसा आहे, असेही मीरा कुमार यांनी यावेळी बोलताना नमूद केले.  

टॅग्स :Meera Kumarमीरा कुमार