शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

कोरोना अजूनही पूर्वी प्रमाणेच घातक!, स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी करायला सांगितला 'हा' मोठा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 1:25 PM

पंतप्रधान दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी देशातील जनतेशी संवाद साधतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशाच्या ताज्या स्थितीशी संबंधित अनेक घटनांचा परिचय जनतेला करून देतात. 

ठळक मुद्देकोरोना अजूनही तेवढाच घातक आहे, जेवढा तो सुरुवातीला होता.मोदींनी मिथिला पेंटिंग बरोबरच आसाममध्ये बांबूच्या वस्थू तयार करून आत्मनिर्भर होत असलेल्या नागरिकांची गोष्टही देशाला सांगितली. आपला देश ज्या उंचीवर उभा आहे, त्या पाठीशी अनेक महान विभूतींची तपश्चर्या आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) त्यांच्या नियोजित 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहार आणि आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीपासून ते कोरोना महामारीच्या संकटापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. सर्वात महत्वाचे म्हणजे, "लक्षात असू द्या, की कोरोना अजूनही तेवढाच घातक आहे, जेवढा तो सुरुवातीला होता. यामुळे आपल्याला पूर्णपणे सावध राहायचे आहे, असे मोदी म्हणाले. 

मोदी म्हणाले, मी आपल्याला आग्रह करेन, की मास्कमुळे त्रास होत असेल आणि मनात आले, की मास्क काढून टाकावा, तेव्हा क्षणभरासाठी त्या डॉक्टरांचे, त्या नर्सेसचे आणि आपल्या कोरोना वॉरियर्सचे स्मरण करा. जे मास्क परिधान करूनच तासंतास, सातत्याने, आपल्या सर्वांचे जीवन वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

यावेळी पंतप्रधान मोदींनी, स्वातंत्र दिनानिमित्त जनतेला कोरोना महामारीपासून मुक्त होण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. तसेच कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. यामुळे मास्कचा वापर नक्की करा, असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी मिथिला पेंटिंग बरोबरच आसाममध्ये बांबूच्या वस्थू तयार करून आत्मनिर्भर होत असलेल्या नागरिकांची गोष्टही देशाला सांगितली. 

आज आपला देश ज्या उंचीवर उभा आहे, त्या पाठीशी अनेक महान विभूतींची तपश्चर्या आहे. ज्यांनी राष्ट्र निर्माणासाठी आपले जीवन समर्पित केले. अशाच महान विभूतींपैकी एक लोकमान्य टिळक. 1 ऑगस्ट 2020 रोजी लोकमान्य टिळकांची 100वी पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळकांचे जीवन आपल्या सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे. ते आपल्या सर्वांना खूप काही शिकवते, असे मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमधील विरांना मानवंदना दिली. तसेच युद्धकाळातील वर्तनाबाबत देशवासियांना मोलाचा सल्ला दिला. यावेळी, युद्धकालीन परिस्थितीमध्ये आम्ही जे काही बोलतो त्याचा सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटंबीयांच्या मनोधैर्यावर थेट परिणाम होत आसतो. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आमचे वर्तन, आमचा व्यवहार, आमची वाणी, आमची विधाने, आमच्या मर्यादा आणि आमचे लक्ष्य या सर्वामध्ये आपण जे काही करत आहोत, त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढले पाहिजे. तसेच त्यांच्या सन्मान वाढला पाहिजे, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी देशातील जनतेशी संवाद साधतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशाच्या ताज्या स्थितीशी संबंधित अनेक घटनांचा परिचय जनतेला करून देतात. 

महत्त्वाच्या बातम्या -

"पापड खाओ कोरोना भगाओ..."; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याLokmanya Tilakलोकमान्य टिळकBiharबिहार