शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

"... तर मी जनतेसमोर 100 उठाबशा काढेन", ममता बॅनर्जींनी दिलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 11:15 IST

पश्चिम बंगाल सरकारने यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असं जाहीर केल्याचं कोणी सिद्ध केलं तर मी लोकांसमोर 100 उठाबशा काढेन असं थेट आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर्षी राज्यात दुर्गा पूजा होणार नाही अशी अफवा पसरवली जात असल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असं जाहीर केल्याचं कोणी सिद्ध केलं तर मी लोकांसमोर 100 उठाबशा काढेन असं थेट आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे. मंगळवारी पोलिस दिनाच्या निमित्ताने व्हिडीओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. 

"एक राजकीय पक्ष दुर्गा पूजेसंबंधी अफवा पसरवत आहे. यासंबंधी अद्याप आपण कोणतीही बैठक घेतलेली नाही. पश्चिम बंगाल सरकारने यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असं जाहीर केल्याचं सिद्ध करुन दाखवा, मी जनतेसमोर 100 उठाबशा काढेन" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच काही बनावट आयटी पेजेस दुर्गा पूजेसंबंधी चुकीची माहिती पसरवत असल्याचं देखील म्हटलं आहे. 

जाणुनबुजून अफवा पसरवण्याचा प्रयत्न

"जाणुनबुजून अफवा पसरवणाऱ्या अशा लोकांना शोधा आणि त्यांना कान पकडून उठाबशा काढायला लावा असं मी पोलिसांना सांगितलं आहे. जातीय सलोखा बिघडवण्यासाठीच हे सर्व केलं जात आहे. ज्यांनी कधीही दुर्गा किंवा हनुमानाची पूजा केलेली नाही ते लोक आता पूजेबद्दल बोलत आहेत" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी मता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या अनलॉक-4 च्या निर्णयावरून निशाणा साधला होता. 

"केंद्र सरकार 'हा' निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही", ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

केंद्र सरकार अनलॉक-4 चा निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. अशा प्रकारचे निर्णय हे राज्य सरकारला लागू करायचे असतात आणि केंद्र सरकारने राज्य सरकारला विश्वासात घेणे आवश्यक अत्यंत आवश्यक आहे. केवळ मार्गदर्शक सूचना जारी करणे पुरेसे असत नाही. केवळ जिल्हा प्रशासनालाच स्थानिक पातळीवर काय स्थिती आहे याची माहिती असते. हे सर्व राज्यघटनेच्या संघीय प्रणालीवर आधारित आहे आणि सर्वांनांच यामध्ये सहकार्य करायला हवं असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. 

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी जीएसटीच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती राज्यांना झालेल्या जीएसटीच्या नुकसानीची भरपाई न देणे हे देशाच्या संघराज्यीय संरचनेला कमजोर करण्यासारखं असल्याचं देखील म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : मोठा निर्णय! 'या' राज्यात मोफत होणार कोरोना चाचणी

CoronaVirus News : हे कसले आई-बाप?, नवजात बाळाला कोरोनाची लागण; रुग्णालयात सोडून जन्मदात्यांनी काढला पळ

कडक सॅल्यूट! 'मजुरांच्या मुलांवर मजुरीची वेळ येऊ नये म्हणून...', शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार

"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका 

"मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न", राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालIndiaभारतPoliceपोलिस