शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

Maharashtra Government: नाराज झालेल्या संजय राऊतांनी लिहिलं राज्यसभा सभापतींना पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 14:57 IST

Maharashtra News : राज्यसभा सभागृहातील माझी बसण्याची जागा तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत करण्यात आली हे जाणून मी आश्चर्यचकित झालो

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपा आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने आग्रही मागणी केली परंतु भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास असहमती दर्शविली. याचाच परिणाम म्हणून शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला. केंद्रातील अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पक्षाला देत असणाऱ्या वागणुकीवर भाष्य करत केंद्र सरकारमधून बाहेर पडले. 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटकपक्षांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला पहिल्यांदाच शिवसेनेला निमंत्रण दिलं नाही. इतकचं काय तर शिवसेनेच्या खासदारांची जागा सत्ताधारी बाकांवर विरोधी बाकांवर करण्यात आली. याच घडामोडीतून शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचीही सभागृहात बसण्याची जागा बदलली. याबाबत नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांनी राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं. 

या पत्रात संजय राऊत म्हणाले की, राज्यसभा सभागृहातील माझी बसण्याची जागा तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत करण्यात आली हे जाणून मी आश्चर्यचकित झालो. शिवसेनेच्या भावना दुखविण्यासाठी आणि आमचा आवाज दडपण्यासाठी हा निर्णय एखाद्याने घेतला असावा. तसेच एनडीएतून शिवसेनेला हटविण्याबाबत औपचारिक घोषणा नसल्याने असं अनाधिकृत पावलं का उचचली याबाबत मला काहीच समजलं नाही. हे कृत्य सभागृहाच्या सन्मानाशी निगडीत आहे. त्यामुळे मी विनंती करतो की, आम्हाला १,२,३ या रांगेत आसानव्यवस्था करुन सभागृहाचा सन्मान ठेवावा असं राऊतांनी सांगितले. 

यापूर्वीही शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपावर टीकास्त्र सोडलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आता शिवसेना नसल्याचे परस्पर जाहीर करण्यात आले. भाजपाच्या धुरिणांनी कशाच्या आधारावर आणि कुणाच्या परवानगीने ही घोषणा केली? प्रवासातील अतिघाई अपघाताला आमंत्रण देई, तशी ही अतिघाई या मंडळींना नडणार आहे. नाही ती नडलीच आहे. शिवनेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी सूत जुळल्याने शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आल्याची घोषणा प्रल्हाद जोशींनी केली. मात्र ही घोषणा करणाऱ्याला शिवसेनेचे मर्म आणि एनडीएचे कर्म धर्म माहित नाहीत .एनडीएच्या बाळंतपणाच्या वेदना शिवसेने अनुभवल्या आहेत. जेव्हा भारतीय जनता पक्षाचा वाऱ्यालाही कुणी उभे राहायला तयार नव्हते. तसेच हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या शब्दांना देशाच्या राजकारणात फार महत्त्व नव्हते तेव्हा आणि त्याआधीही जनसंघाच्या पणतीत तेल घालण्याचे काम शिवसेनेने केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेला बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार