शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: नाराज झालेल्या संजय राऊतांनी लिहिलं राज्यसभा सभापतींना पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 14:57 IST

Maharashtra News : राज्यसभा सभागृहातील माझी बसण्याची जागा तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत करण्यात आली हे जाणून मी आश्चर्यचकित झालो

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपा आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने आग्रही मागणी केली परंतु भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास असहमती दर्शविली. याचाच परिणाम म्हणून शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला. केंद्रातील अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पक्षाला देत असणाऱ्या वागणुकीवर भाष्य करत केंद्र सरकारमधून बाहेर पडले. 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटकपक्षांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला पहिल्यांदाच शिवसेनेला निमंत्रण दिलं नाही. इतकचं काय तर शिवसेनेच्या खासदारांची जागा सत्ताधारी बाकांवर विरोधी बाकांवर करण्यात आली. याच घडामोडीतून शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचीही सभागृहात बसण्याची जागा बदलली. याबाबत नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांनी राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं. 

या पत्रात संजय राऊत म्हणाले की, राज्यसभा सभागृहातील माझी बसण्याची जागा तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत करण्यात आली हे जाणून मी आश्चर्यचकित झालो. शिवसेनेच्या भावना दुखविण्यासाठी आणि आमचा आवाज दडपण्यासाठी हा निर्णय एखाद्याने घेतला असावा. तसेच एनडीएतून शिवसेनेला हटविण्याबाबत औपचारिक घोषणा नसल्याने असं अनाधिकृत पावलं का उचचली याबाबत मला काहीच समजलं नाही. हे कृत्य सभागृहाच्या सन्मानाशी निगडीत आहे. त्यामुळे मी विनंती करतो की, आम्हाला १,२,३ या रांगेत आसानव्यवस्था करुन सभागृहाचा सन्मान ठेवावा असं राऊतांनी सांगितले. 

यापूर्वीही शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपावर टीकास्त्र सोडलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आता शिवसेना नसल्याचे परस्पर जाहीर करण्यात आले. भाजपाच्या धुरिणांनी कशाच्या आधारावर आणि कुणाच्या परवानगीने ही घोषणा केली? प्रवासातील अतिघाई अपघाताला आमंत्रण देई, तशी ही अतिघाई या मंडळींना नडणार आहे. नाही ती नडलीच आहे. शिवनेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी सूत जुळल्याने शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आल्याची घोषणा प्रल्हाद जोशींनी केली. मात्र ही घोषणा करणाऱ्याला शिवसेनेचे मर्म आणि एनडीएचे कर्म धर्म माहित नाहीत .एनडीएच्या बाळंतपणाच्या वेदना शिवसेने अनुभवल्या आहेत. जेव्हा भारतीय जनता पक्षाचा वाऱ्यालाही कुणी उभे राहायला तयार नव्हते. तसेच हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या शब्दांना देशाच्या राजकारणात फार महत्त्व नव्हते तेव्हा आणि त्याआधीही जनसंघाच्या पणतीत तेल घालण्याचे काम शिवसेनेने केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेला बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार