शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Maharashtra Government: नाराज झालेल्या संजय राऊतांनी लिहिलं राज्यसभा सभापतींना पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 14:57 IST

Maharashtra News : राज्यसभा सभागृहातील माझी बसण्याची जागा तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत करण्यात आली हे जाणून मी आश्चर्यचकित झालो

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपा आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने आग्रही मागणी केली परंतु भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास असहमती दर्शविली. याचाच परिणाम म्हणून शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला. केंद्रातील अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पक्षाला देत असणाऱ्या वागणुकीवर भाष्य करत केंद्र सरकारमधून बाहेर पडले. 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटकपक्षांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला पहिल्यांदाच शिवसेनेला निमंत्रण दिलं नाही. इतकचं काय तर शिवसेनेच्या खासदारांची जागा सत्ताधारी बाकांवर विरोधी बाकांवर करण्यात आली. याच घडामोडीतून शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचीही सभागृहात बसण्याची जागा बदलली. याबाबत नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांनी राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं. 

या पत्रात संजय राऊत म्हणाले की, राज्यसभा सभागृहातील माझी बसण्याची जागा तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत करण्यात आली हे जाणून मी आश्चर्यचकित झालो. शिवसेनेच्या भावना दुखविण्यासाठी आणि आमचा आवाज दडपण्यासाठी हा निर्णय एखाद्याने घेतला असावा. तसेच एनडीएतून शिवसेनेला हटविण्याबाबत औपचारिक घोषणा नसल्याने असं अनाधिकृत पावलं का उचचली याबाबत मला काहीच समजलं नाही. हे कृत्य सभागृहाच्या सन्मानाशी निगडीत आहे. त्यामुळे मी विनंती करतो की, आम्हाला १,२,३ या रांगेत आसानव्यवस्था करुन सभागृहाचा सन्मान ठेवावा असं राऊतांनी सांगितले. 

यापूर्वीही शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपावर टीकास्त्र सोडलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आता शिवसेना नसल्याचे परस्पर जाहीर करण्यात आले. भाजपाच्या धुरिणांनी कशाच्या आधारावर आणि कुणाच्या परवानगीने ही घोषणा केली? प्रवासातील अतिघाई अपघाताला आमंत्रण देई, तशी ही अतिघाई या मंडळींना नडणार आहे. नाही ती नडलीच आहे. शिवनेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी सूत जुळल्याने शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आल्याची घोषणा प्रल्हाद जोशींनी केली. मात्र ही घोषणा करणाऱ्याला शिवसेनेचे मर्म आणि एनडीएचे कर्म धर्म माहित नाहीत .एनडीएच्या बाळंतपणाच्या वेदना शिवसेने अनुभवल्या आहेत. जेव्हा भारतीय जनता पक्षाचा वाऱ्यालाही कुणी उभे राहायला तयार नव्हते. तसेच हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या शब्दांना देशाच्या राजकारणात फार महत्त्व नव्हते तेव्हा आणि त्याआधीही जनसंघाच्या पणतीत तेल घालण्याचे काम शिवसेनेने केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेला बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार