शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटिंगसाठी दिल्लीत महाराष्ट्र केंद्र

By admin | Updated: November 15, 2014 02:10 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्रातील उद्योगांसह संस्कृतीचे ब्रॅण्डिंग व मार्केटिंग करण्यासाठी नवी दिल्लीत पूर्ण क्षमतेचे ‘महाराष्ट्र केंद्र’ स्थापण्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : महाराष्ट्र क्रमांक 1चे राज्य असूनही ब्रॅण्डिंग व मार्केटिंगमध्ये मागे पडलो असल्याची कबुली देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्रातील उद्योगांसह संस्कृतीचे ब्रॅण्डिंग व मार्केटिंग करण्यासाठी नवी दिल्लीत पूर्ण क्षमतेचे ‘महाराष्ट्र केंद्र’ स्थापण्याची घोषणा केली. 
येथील प्रगती मैदानावर 34व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी उद्योगमंत्री प्रकाश महेता, केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय उपस्थित होते. ‘महिला उद्योजकता’ ही यावर्षीच्या मेळाव्याची संकल्पना असल्याने मुंबई ते गडचिरोली या भागातील महिलांनी लहान-मोठे वस्तुनिर्मितीचे स्टॉल येथे लावले आहेत. त्या प्रत्येक स्टॉलला त्यांनी भेट दिली. 
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 97 महिला उद्योजिकांच्या कॉफिटेबल बुक, 16 हस्तकलांच्या पुस्तिकांचे तर महिला उद्योजिका नेमक्या कशी काम करतात, ते दाखविणा:या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. राज्याचे उद्योग धोरण सक्षम आहे. परंतु त्यामध्ये महिलांच्या औद्यागिक प्रगतीसाठी फार विशेष लक्ष घातलेले नाही. या पाश्र्व भूमीवर उद्योगांमध्ये महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
देशाच्या विविध राज्यांतील उद्योग, व्यापार, हस्तकला इत्यादींना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विविध देशांचा भारतासोबत व्यापार संबंध वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्या उद्योग व वाणिज्य मंत्रलयाच्या वतीने दरवर्षी 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. विविध राज्यांच्या दालनांमध्ये उद्योग, हस्तकला, पाक कला इत्यादी उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येते. 
महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जवाहरलाल नेहरु  पोर्ट ट्रस्ट, सिडको, एमसीइडी, एनआयएफटीसह राज्यातील मोठे उद्योग, लद्यु उद्योग आदींचे एकूण 75 गाळे दालनामध्ये आहेत. (विशेष प्रतिनिधी)
 
आठवलेंनी घेतली भेट
मुख्यमंत्री राजधानीत आल्याची माहिती मिळाल्यावर खासदार रामदास आठवले यांनी त्यांची मेळाव्यात भेट घेतली. पत्रकारांना आठवले यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या पक्षाला स्थान देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.