शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

महंत परमहंस दास यांचे बेमुदत उपोषण, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 13, 2020 13:57 IST

मुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट करण्यात यावे. तसेच मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठवण्यात यावे आणि पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदूंना भारतात आणावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Ayodhya)

ठळक मुद्देमुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट करण्यात यावे. तसेच मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठवण्यात यावे - महंत परमहंस दास पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदूंना भारतात आणावे - महंत परमहंस दास 1 ऑक्टोबर 2018 रोजी ते अन्न आणि पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले होते.

अयोध्या - तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास हे सोमवारपासून बेमुदत उपोशणाला बसले आहेत. उपोषणाला बसत त्यांनी सरकारकडे भारतालाहिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही, तर मुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट करण्यात यावे. तसेच मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठवण्यात यावे आणि पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदूंनाभारतात आणावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. परमहंस दास यांनी यापूर्वीही राम जन्मभूमीसाठी अनेक दिवस बेमुदत उपोषण केले आहे.

कोण आहेत परमहंस दास -परमहंस दास हे अयोध्येत राहतात. ते तपस्वी छावनीचे महंत आहेत. मुस्लिमांवरील वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. ऑक्टोबर 2018मध्ये संत परमहंस यांनी अनेक दिवस राम जन्मभूमीसाठी बेमुदत उपोषण केले होते. 1 ऑक्टोबर 2018 रोजी ते अन्न आणि पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले होते. प्रशासनानेही अनेक वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर उपोषणाच्या सातव्या दिवशी पोलिसांनी त्यांना बळजबरीनेच आजारपणाचा हवाला देत उचलले होते आणि पीजीआयमध्ये दाखल केले होते. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून आणि ज्यूस देऊन त्यांचे उपोषण संपवले होते.

चिता रचून आत्मदहन करण्याचीही केली होती घोषणा - परमहंस दास यांनी तपस्वी छावनी मंदिरात बाबर विचारधारा विध्वंस महायज्ञ करण्याचीही घोषणा केली होती. ते 6 डिसेंबरला दुपारी 12 वाजता आपली चिता तयार करून आत्मदहन करण्याच्या निर्णयावर ठाम होते. राम मंदिर उभारणीच्या मागणीसंदर्भात कसल्याही प्रकारचा निर्णय होत नसल्याने महंत परमहंस दास नाराज होते. मात्र, दोन दिवस आधीच परमहंस यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना, सीजीएम न्यायालयातही दाखल करण्यात आले होते. सीजीएम यांनी त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याHinduहिंदूMuslimमुस्लीमIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेश