शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:26 IST

तरुणाने सांगितलं की, त्याने ५ महिन्यांपूर्वी इंदूरमधील सिमरोल गावातील यशवीशी प्रेमविवाह केला होता.

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एक अनोखी घटना समोर आली आहे. हातात फलक घेऊन तरुण दोन महिन्यांपासून आपल्या पत्नीचा शोध घेत आहे. पतीने गंभीर आरोप केला आहे की, त्याच्या सासरच्यांनी त्याच्या पत्नीचं अपहरण केलं आहे.

धर्मेंद्र नागराज असं या तरुणाचं नाव आहे. धर्मेंद्रच्या पत्नीचं दोन महिन्यांपूर्वी अपहरण झालं होतं आणि त्याला त्याच्या सासरच्या लोकांवर संशय आहे. हातात एक फलक घेऊन तो त्याच्या हरवलेल्या पत्नीला शोधण्यासाठी मदत मागत आहे.

तरुणाने सांगितलं की, त्याने ५ महिन्यांपूर्वी इंदूरमधील सिमरोल गावातील यशवीशी प्रेमविवाह केला होता. दोन महिन्यांपूर्वी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता काही अज्ञात लोक कारमधून आले आणि त्यांनी पत्नी यशवीचं अपहरण केलं. प्रेमविवाहामुळे सासरच्या मंडळींना राग आला होता आणि त्यांनी पत्नीला परत घेऊन जाण्याची धमकी दिली होती. घटनेनंतर धर्मेंद्रने छिपाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीएम हेल्पलाइन १८१ आणि एसपी ऑफिसमध्येही तक्रार केली, पण कोणतीही कारवाई झाली नाही.

२ महिन्यांपूर्वी अचानक पत्नीचं अपहरण

धर्मेंद्रने सांगितलं की, ५ वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर दोघांची मैत्री झाली. यानंतर दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. ५ वर्षांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झाल्यानंतर, दोघांनीही घरातून पळून जाऊन आर्य समाज मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर दोघेही आनंदाने आयुष्य जगत होते, पण २ महिन्यांपूर्वी अचानक पत्नीचं अपहरण झालं. पोलीसही या प्रकरणात मदत करत नाहीत. 

"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"

पती म्हणतो की,  त्याला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. २४ फेब्रुवारीच्या रात्री १ वाजता धर्मेंद्रला एका अनोळखी नंबरवरून यशवीचा मेसेज आला. यशवीने मेसेजमध्ये लिहिलं होतं, मला घेऊन जायला ये, हे लोक मला घेऊन आले आहेत. तिने मेसेजमध्ये घराचा पत्ताही लिहिला. एकटा येऊ नकोस, पोलिसांनाही सोबत घेऊन ये कारण इथे खूप गुंड आहेत असा सल्लाही दिला. तिने असंही सांगितले की तिचं सकाळी ९ वाजेपर्यंत तिचं दुसरं लग्न लावलं जाईल आणि हे लोक धर्मेंद्रला खोट्या प्रकरणात अडकवून जेलमध्ये पाठवतील.

सासरच्या लोकांना प्रेमविवाहाचा राग होता. म्हणूनच संशय माझ्या सासरच्या लोकांवर आहे. मी चिपाबाद पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तक्रार दाखल केली पण आतापर्यंत पोलीस विभागाने कोणतीही योग्य कारवाई केलेली नाही असंही तरुणाने म्हटलं आहे. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.  

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस