शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस सोडून भाजपत का आले? जेपी नड्डांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 17:32 IST

नड्डा म्हणाले, दीड वर्षे आपण पाहिले आहे, की काँग्रेस सरकार कसे चालते. दीड वर्षे दक्षिणा आणि ट्रान्सफर वाले सरकार आले होते. या दीड वर्षातच, अंधःकार आणि प्रकाशात काय फरक असतो? अमावस्या आणि पौर्णिमेत काय फरक असतो? भ्रष्टाचार आणि प्रामाणीकपणाचे सरकार कसे चालते? हे आपल्या लक्षात आले. (jp nadda attack on congress)

भोपाल - भाजप कार्यसमितीच्या बैठकीत दिग्गज नेत्यांनी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. गुरुवारी झालेल्या या बैठकीच्या उद्घाटन सत्राला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी वर्चुअली संबोधित केले. ते म्हणाले, दीड वर्षे आपण पाहिले आहे, की काँग्रेस सरकार कसे चालते. दीड वर्षे दक्षिणा आणि ट्रान्सफर वाले सरकार आले होते. या दीड वर्षातच, अंधःकार आणि प्रकाशात काय फरक असतो? अमावस्या आणि पौर्णिमेत काय फरक असतो? भ्रष्टाचार आणि प्रामाणीकपणाचे सरकार कसे चालते? हे आपल्या लक्षात आले. (Madhya Pradesh BJP working committee meeting jp nadda attack on congress leader kamal nath)

तत्कालीन कमलनाथ सरकारवर निशाणा साधताना नड्डा म्हणाले, किमिशनचे रुपांतर कमीशनमध्ये झाले होते. प्रत्येक वर्गाला फसवणूकीशिवाय काही मिळाले नाही. शिंदे योग्य विचारसरणीचे होते, म्हणून ते आमच्यासोबत आले. कोरोना काळाचा उल्लेख करताना जेपी नड्डा म्हणाले, गेल्या दिड वर्षात सर्वच पक्ष ICU मध्ये गेले आहेत. मात्र, भाजप कार्यकर्ते. जीव धोक्यात घालून मैदानात उतरले आहेत. यावेळी जेपी नड्डा यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि लसीकरण मोहिमेसाठी एमपी सरकार आणि संघटनेचे कौतुक केले.

सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू, शिंदेंनी 150 हून अधिक लोकांना दिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री शिवराज यांचा राहुल गांधींवर निशाणा -उद्घाटन सत्राला संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. राहुल गांधींवर हल्ला चढवताना ते म्हणाले, तुमच्या काळात लस तयार करायला 4- 4, 5 - 5 वर्ष लागत होते. पंतप्रधान मोदींनी एप्रिल महिन्यात  टास्क फोर्स तयार केला आणि देशाला को-व्हॅक्सीन मिळाली. मध्य प्रदेशने लसीकरणाचा विक्रम केला आहे. काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. कशा दिल्या, कुठून दिल्या? जयराम रमेश, पी चिदम्बरम, दिग्विजय, कमल नाथ सर्वच एकत्र झाले आणि जनतेचा विश्वासघात केला. मात्र, आम्ही 11 लाखहून अधिक डोस देऊन विक्रम बनवला.

आधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेल - ज्योतिरादित्य शिंदे -देशात आणि मध्य प्रदेशात कोरोनाच्या महामारीचा फैलाव होत होता, तेव्हा काँग्रेसने राजकारण केले. काँग्रेस कधी लसीकरण करणार नाही असे सांगते, तर कधी लसींमध्ये मांस असल्याचं सांगते, आता ते स्वत:च लस घेण्यासाठी धावपळ करत आहेत. काँग्रेसला ग्वाल्हेरचे नाव बदलण्याची एवढीच इच्छा आहे, तर त्यांना आधी स्वत:चे नाव बदलावे लागले. लोकांच्या मनामध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी काँग्रेसने नाव बदलावे, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले आहे. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेस