शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस सोडून भाजपत का आले? जेपी नड्डांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 17:32 IST

नड्डा म्हणाले, दीड वर्षे आपण पाहिले आहे, की काँग्रेस सरकार कसे चालते. दीड वर्षे दक्षिणा आणि ट्रान्सफर वाले सरकार आले होते. या दीड वर्षातच, अंधःकार आणि प्रकाशात काय फरक असतो? अमावस्या आणि पौर्णिमेत काय फरक असतो? भ्रष्टाचार आणि प्रामाणीकपणाचे सरकार कसे चालते? हे आपल्या लक्षात आले. (jp nadda attack on congress)

भोपाल - भाजप कार्यसमितीच्या बैठकीत दिग्गज नेत्यांनी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. गुरुवारी झालेल्या या बैठकीच्या उद्घाटन सत्राला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी वर्चुअली संबोधित केले. ते म्हणाले, दीड वर्षे आपण पाहिले आहे, की काँग्रेस सरकार कसे चालते. दीड वर्षे दक्षिणा आणि ट्रान्सफर वाले सरकार आले होते. या दीड वर्षातच, अंधःकार आणि प्रकाशात काय फरक असतो? अमावस्या आणि पौर्णिमेत काय फरक असतो? भ्रष्टाचार आणि प्रामाणीकपणाचे सरकार कसे चालते? हे आपल्या लक्षात आले. (Madhya Pradesh BJP working committee meeting jp nadda attack on congress leader kamal nath)

तत्कालीन कमलनाथ सरकारवर निशाणा साधताना नड्डा म्हणाले, किमिशनचे रुपांतर कमीशनमध्ये झाले होते. प्रत्येक वर्गाला फसवणूकीशिवाय काही मिळाले नाही. शिंदे योग्य विचारसरणीचे होते, म्हणून ते आमच्यासोबत आले. कोरोना काळाचा उल्लेख करताना जेपी नड्डा म्हणाले, गेल्या दिड वर्षात सर्वच पक्ष ICU मध्ये गेले आहेत. मात्र, भाजप कार्यकर्ते. जीव धोक्यात घालून मैदानात उतरले आहेत. यावेळी जेपी नड्डा यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि लसीकरण मोहिमेसाठी एमपी सरकार आणि संघटनेचे कौतुक केले.

सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू, शिंदेंनी 150 हून अधिक लोकांना दिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री शिवराज यांचा राहुल गांधींवर निशाणा -उद्घाटन सत्राला संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. राहुल गांधींवर हल्ला चढवताना ते म्हणाले, तुमच्या काळात लस तयार करायला 4- 4, 5 - 5 वर्ष लागत होते. पंतप्रधान मोदींनी एप्रिल महिन्यात  टास्क फोर्स तयार केला आणि देशाला को-व्हॅक्सीन मिळाली. मध्य प्रदेशने लसीकरणाचा विक्रम केला आहे. काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. कशा दिल्या, कुठून दिल्या? जयराम रमेश, पी चिदम्बरम, दिग्विजय, कमल नाथ सर्वच एकत्र झाले आणि जनतेचा विश्वासघात केला. मात्र, आम्ही 11 लाखहून अधिक डोस देऊन विक्रम बनवला.

आधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेल - ज्योतिरादित्य शिंदे -देशात आणि मध्य प्रदेशात कोरोनाच्या महामारीचा फैलाव होत होता, तेव्हा काँग्रेसने राजकारण केले. काँग्रेस कधी लसीकरण करणार नाही असे सांगते, तर कधी लसींमध्ये मांस असल्याचं सांगते, आता ते स्वत:च लस घेण्यासाठी धावपळ करत आहेत. काँग्रेसला ग्वाल्हेरचे नाव बदलण्याची एवढीच इच्छा आहे, तर त्यांना आधी स्वत:चे नाव बदलावे लागले. लोकांच्या मनामध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी काँग्रेसने नाव बदलावे, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले आहे. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेस