शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

26 आकडा पंतप्रधानांसाठी लकी; काय आहे नरेंद्र मोदींचे खास कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 18:27 IST

भाजपा आणि मित्रपक्षांची आघाडी 340 हून अधिक जागांपर्यंत पोहोचली आहे. दक्षिण भारत वगळता देशातील सर्वच भागातून भाजपा आणि मित्रपक्षांना जोरदार समर्थन मिळाले आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालं आहे. 2014 च्या तुलनेत नरेंद्र मोदी यांना प्रचंड प्रमाणात बहुमत लोकांनी दिलं आहे. भाजपा स्वबळावर 300 चा आकडा पार करत आहे. सलग दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर बसणार आहेत. येत्या 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होईल असं सांगितलं जात आहे. मात्र 26 मे का? याबाबत अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. 

26 हा आकडा पाहिला तर 2-6 = 8 हा आकडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शुभ मानला जातो. अंकशास्त्रानुसार 26 मे या अंकाला जोडलं तर त्याची बेरीज 8 होते. 26 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. 26 मे रोजी मागच्यावेळी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. सर्वात विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख 17 सप्टेंबर आहे. 17 आकड्याची बेरीजही 8 होते. 

सतराव्या लोकसभेचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हाती आलेले कल आणि काही निकालांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 340 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपानेही स्वबळावर 300 पार मजल मारण्याच्या दिशेने कूच केली आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची पुन्हा एकदा दाणादाण उडाली असून, काँग्रेस आणि मित्रपक्ष 90 हून अधिक जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर पक्ष 110 जागांवर आघाडीवर आहेत. 

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजपा आणि मित्रपक्षांनी आघाडी घेतली होती. मतमोजणीला सुरुवात होऊन  नऊ तास उलटले असून, भाजपा आणि मित्रपक्षांची आघाडी 340 हून अधिक जागांपर्यंत पोहोचली आहे. दक्षिण भारत वगळता देशातील सर्वच भागातून भाजपा आणि मित्रपक्षांना जोरदार समर्थन मिळाले आहे. 

महाआघाडीने कडवे आव्हान उभे केलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने आपले वर्चस्व राखले असून, उत्तर प्रदेशात 58 हून अधिक जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. बिहारमध्येही भाजपा आणि मित्रपक्ष 36 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाराष्ट्रामध्ये 41 जागांवर शिवसेना भाजपा युती आघाडीवर आहे. 

या विजयावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींही प्रतिक्रिया दिली आहे. सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत, असं मोदी ट्विट करत म्हणाले आहेत. एकत्र विकास करू,  एकत्र उन्नती करू, एक मजबूत आणि सर्वसमावेशक भारत तयार करू, अशी आशाही मोदींनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदी