शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

राष्ट्रवाद आणि हिंदुत्व नव्हे, तर जात मतदारांवर सर्वाधिक टाकतेय प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 08:42 IST

मंगळसूत्र बनला निवडणूक मुद्दा, केवळ उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकच नाही, तर देशातील अनेक राज्यांमध्ये जात मतदारांवर सर्वाधिक प्रभाव टाकताना दिसत आहे

संजय शर्मा नवी दिल्ली : निवडणुकीत राष्ट्रवाद आणि हिंदुत्व हे निवडणुकीचे मुद्दे बनताना दिसत नाहीत. मतदार अजूनही जातीबाबत अधिक जागरूक आहेत. निवडणूक आणि मतदान या दोन्हींवर जातीवादाचे वर्चस्व आहे. 

अब की बार ३७० पार आणि एनडीए के साथ ४०० पार या घोषणा भाजपने दिल्या. पण, दुसऱ्या टप्प्यापूर्वी यावरून काळजी वाढली आहे. २०१९ च्या निवडणुकांप्रमाणेच खूप प्रयत्न करूनही निवडणुका राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर येत नाहीत.  आतापर्यंत जे कल आले आहेत, त्यावरून असे दिसून येत आहे की, जातीवादाचा प्रभाव मतदारांवर अधिक प्रमाणात आहे. 

निवडणुकीत नेमका मुद्दा काय चालतोय?केवळ उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकच नाही, तर देशातील अनेक राज्यांमध्ये जात मतदारांवर सर्वाधिक प्रभाव टाकताना दिसत आहे. राष्ट्रीय मुद्दे सीएए, एनआरसी, राष्ट्रीय सुरक्षा, पाकिस्तान, कलम ३७०, समान नागरी कायदा, देशाचा विकास, जी २० हे अद्याप निवडणुकीचे मुद्दे बनलेले नाहीत. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांमध्ये राम मंदिर अग्रस्थानी होते, पण आजपर्यंत राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा बनलेला नाही. त्याऐवजी, यादव, जाट, गुर्जर, मीणा, राजपूत, कुशवाह, कुर्मी, जाटव, रेड्डी, लिंगायत, वोकलिंगा समाजातील असणे हा एक मोठा मुद्दा बनला आहे. हा मुद्दा मतदारांना थेट उमेदवारांशी जोडणारा आहे, असे चित्र पहायला मिळत आहे.

भाजप म्हणते काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लीम लीगचाकाँग्रेसच्या जाहीरनाम्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप मुस्लीम लीगचा जाहीरनामा म्हणत आहे. काँग्रेस लोकांचे सोने, चांदी आणि मंगळसूत्रही हिसकावून घेईल, असे पंतप्रधान मोदी म्हणत आहेत. सॅम पित्रोदा यांनी वारसा कर लागू करण्याच्या वक्तव्यानंतर भाजपला काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची जोरदार संधी मिळाली आहे.

भाजपकडे मोठा मुद्दा...मंगळसूत्र आणि मालमत्ता वाटप हे दोन्ही निवडणुकीचे मुद्दे बनले आहेत. काँग्रेसने सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याला वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. मात्र, यामुळे निवडणुकीच्या काळात भाजपच्या हाती मोठा मुद्दा मिळाला आहे. याचे भांडवल करण्याची सर्व नेत्यांची तयारी सुरू आहे. भाजपचे सर्व केंद्रीय मंत्री, नेते एकाच सुरात काँग्रेसच्या या विधानाचा विरोध करत आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा