शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
4
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
5
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
6
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
7
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
8
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
9
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
10
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
11
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
12
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
13
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
14
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
15
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
16
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
17
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
18
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
19
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
20
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...

राहुल गांधींच्या ‘हम दो, हमारे दो’ वक्तव्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा पलटवार; भरसभागृहात म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 21:16 IST

देश फक्त हम दो आणि हमारे दो यांच्यासाठीच चालवला जात आहे. यात हम दो आणि हमारे दो कोण आहेत, हे आता संपूर्ण देशाला माहित झाले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. (Rahul Gandhi)

नवी दिल्ली - केंद्र सरकारवर निशाणा साधताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी ‘हम दो, हमारे दो’ (Hum Do Hamare Do) अशी टिप्पणी केली होती. यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी जबरदस्त पलटवार केला आहे. यावर बोलताना ठाकूर म्हणाले, राहुल यांच्या बोलण्याचा आशय ‘दीदी, जीजाजी आणि त्यांचे कुटुंब’ असा असेल. (Union minister Anurag Thakur attack on Rahul Gandhi)

लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा करताना, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत ठाकूर म्हणाले, राहूल गांधी अर्थसंकल्पावर तयारी करून आले नाही. काँग्रेस नेते सभागृह आणि देशातही कमीच राहतात. तसेच ते हम दो, हमारे दोवर बोलतात, असे म्हणून ते दीदी, जीजाजी तथा मुलांच्या संदर्भात बोलतात, असे ठाकूर म्हणाले.

Rahul Gandhi in Loksabha: लिहून घ्या, शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही; राहुल गांधी लोकसभेत गरजले

अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘मी राहुल गांधी यांना विचारू इच्छितो, की ते ज्या दोन उद्योगपती घरांसंदर्भात बोलत आहेत, त्यांना केरळमध्ये काँग्रेस सरकार असताना बंदर का देण्यात आले? हे आपलेच आहेत, आपणच पाळले आहेत.’’

राहुल गांधींवर निशाणा साधत ते म्हणाले, ‘‘असे कुठे लिहिले आहे, की अमेठीतून निवडणूक लढणारे राहुल गांधी निवडणूक हारल्यानंतर वायनाडमधून निवडणूक लढू शकत नाही. ते कुठूनही निवडणूक लढू शकतात. मग, अमेठीतील शेतकरी वायनाडमध्ये आपले पीक का विकू शकत नाही?’’ एवढेच नाही, तर काँग्रेस आणि काही इतर पक्षांचे लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत,असेही ठाकूर म्हणाले.

यावेळी, अर्थसंकल्प 2021-22 वर बोलताना अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, या अर्थसंकल्पात आशेचा किरण दिसतो. तसेच यात, देशाला आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच नव्या भारताची रचना करण्यावरही भर देण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदींच्या ‘‘सशक्त भारत’’ विचारानुरूप आहे. एवढेच नाही, तर सर्वच स्थरांतून यांचे कौतुक करण्यात आले आहे.

सरकार जवानांच्या बलिदानाचा अपमान का करतंय?: राहुल गांधी

काय म्हणाले होते राहुल गांधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघे देशातील दोन बड्या उद्योगपतींसाठी देश चालवत असल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी केला होता. "देश फक्त हम दो आणि हमारे दो यांच्यासाठीच चालवला जात आहे. यात हम दो आणि हमारे दो कोण आहेत, हे आता संपूर्ण देशाला माहित झाले आहे. हे फक्त शेतकऱ्यांचे आंदोलन आहे, असे जर तुम्ही समजत असाल तर ही मोठी चूक आहे. हे शेतकऱ्यांचे नाही, तर संपूर्ण देशाचे आंदोलन आहे. मी आजही लिहून देतो की कृषी कायदे रद्द केल्याशिवाय शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत. मोदींना कृषी कायदे रद्द करावेच लागतील", असेही राहुल गांधी म्हणाले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलन