शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 6:18 AM

द्वेषाचे राजकारण, नोटाबंदी, जीएसटीचा बसला फटका

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक पट्ट्यातील निकाल म्हणजे २०१९ च्या निवडणुकांसाठी भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. तेलंगणात काँग्रेसला यश मिळाले नसले आणि मिझोरममध्ये असलेली सत्ता हातातून गेली असली, तरी ‘अजेय’ भाजपाला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभूत केले जाऊ शकते, असे या निकालांनी दाखवून दिले आहे. यापैकी मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये सलग १५ वर्षे भाजपाचीच सत्ता होती.शिवराज सिंह यांच्यामागे रा. स्व. संघाने आपली सारी ताकद लावूनही त्याचा उपयोग झाला नाही. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भव्य विजय मिळविला हे या निवडणुकीतील आश्चर्य आहे. कारण याची अपेक्षा नव्हती. अजित जोगी आणि बसपाची आघाडी काँग्रेसच्या मतात घट करेल, असे बोलले जात होते, पण याच्या उलट झाले. या ९० सदस्यांच्या विधानसभेत बसपा आणि जोगी यांच्या आघाडीला फक्त ९ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपा जेमतेम १५ जागांवर आला असून, काँग्रेसने तब्बल ६३ जागांवर विजय मिळविला आहे. राजस्थानातही भाजपाने २०१४ मध्ये लोकसभेच्या सर्व २५ जागा जिंकल्या होत्या, पण आज परिस्थिती बदलली आहे.सार्वत्रिक निवडणुका सहा महिन्यांवर आल्या असताना, हिंदी भाषिक आणि गायीचा मुद्दा चर्चिला गेलेल्या २२४ लोकसभा जागांवरून ही लढाई सुरू झाली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने या दहा राज्यांतून १७४ जागा जिंकल्या होत्या. या निकालांच्या आदल्या दिवशी, सोमवारी २१ विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. आता ते आणखी मजबूत होतील. बसपा व सपाचे नेते बैठकीला नव्हते. तेही आता सोबत येऊ शकतील. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी संकेत दिले आहेत की, राहुल गांधी यांनी अडथळे त्यांच्यासह काम करण्यात येणारे मतभेद दूर केले आहेत. एकत्र आलेल्या या २१ पक्षांचा हाच उद्देश आहे आणि तो म्हणजे आगामी निवडणुकीत भाजपाचा पराभव करणे. कारण नरेंद्र मोदी आता अजेय राहिलेले नाहीत.धार्मिक ध्रुवीकरणाने मते आकर्षित होणार नाहीतभाजपाला वाटते की, राम मंदिराच्या मुद्द्याने मध्य प्रदेशातील घसरण रोखण्यास मदत झाली, पण पक्षातील एका वर्गाला असेही वाटते की, मोदींनी विकास अजेंड्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. धार्मिक धु्रवीकरणाने मते आकर्षित होणार नाहीत. ‘लिंचिंग’च्या घटनांमुळे भलेही हिंदुत्ववादी खुश झाले असतील, पण सरकारवर नाराज असलेल्या लोकांचे मतपरिवर्तन करण्यास याची मदत झाली नाही. द्वेष पसरविणारे योगी आदित्यनाथही अपयशी ठरले. त्यांनी असंख्य सभा घेतल्या. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, या विजयाने विरोधकांच्या एकीला मोठी उभारी मिळाली आहे. यातून नवा अध्याय लिहिला जाईल.जनता मग्रुरी सहन करीत नाही : पवारजनता कधीच गुर्मी,मग्रुरी सहन करीत नाही, असे या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chhattisgarhछत्तीसगडRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी