शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

Priyanka Gandhi : "हा पैसा गेला कुठे, भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवतेय?"; प्रियंका गांधी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 12:17 PM

Lok Sabha Election 2024 And Priyanka Gandhi : प्रियंका गांधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधत सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधत सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. तसेच "भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवत आहे?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे की, भारत सरकार चालू आर्थिक वर्षात 14 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेणार आहे. पण का?"

"स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंतच्या 67 वर्षांत देशावर एकूण 55 लाख रुपये कर्ज होते. गेल्या 10 वर्षात एकट्या मोदीजींनी ते 205 लाख कोटी रुपये केले. गेल्या 10 वर्षांत सुमारे 150 लाख कोटी रुपयांचे कर्ज या लोकांनी घेतलं आहे. आज देशातील प्रत्येक नागरिकावर सरासरी कर्ज सुमारे दीड लाख रुपये आहे. हा पैसा राष्ट्रनिर्माणाच्या कोणत्या कामासाठी वापरला जात आहे?"

"नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या की प्रत्यक्षात नोकऱ्या गायब झाल्या? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? शाळा आणि रुग्णालयांचं काय झालं? सार्वजनिक क्षेत्र मजबूत झाले की कमकुवत झाले? मोठे- मोठे कारखाने आणि उद्योग उभारले गेले का?"

"जर असे झाले नाही, जर अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्रांची दुरवस्था झाली असेल, जर श्रमशक्ती कमी झाली असेल, जर छोटे आणि मध्यम उद्योग उद्ध्वस्त झाले असतील - तर हा पैसा गेला कुठे? कोणत्या गोष्टीवर किती पैसा खर्च झाला? मोठ्या अब्जाधीशांच्या कर्जमाफीवर किती पैसे खर्च झाले?"

"आता सरकार नवे कर्ज घेण्याची तयारी करत असताना, गेल्या 10 वर्षांपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याऐवजी बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक संकटाचा ओझं वाढत असताना, भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे" असं देखील प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४