शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मतदान केलं नाही म्हणून पक्षाने पाठवली नोटीस; BJP खासदार म्हणाले, "सभेला बोलवलं नाही तर मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 09:30 IST

Jayant Sinha : भाजप खासदार जयंत सिन्हा यांनी पक्षाने पाठवलेल्या नोटीशीला दोन पानी पत्राद्वारे उत्तर दिलं आहे.

Jayant Sinha to BJP Notice : झारखंडच्या हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याने विद्यमान खासदार जयंत सिन्हा यांनी निवडणूक प्रचारातून अंग काढून घेतलं होतं. त्यानंतर जयंत सिन्हा यांना भाजपने सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. भाजपने हजारीबाग मतदारसंघातून सिन्हा यांच्याऐवजी मनीष जयस्वाल यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या सिन्हा यांनी प्रचारातून अंग काढून घेतले. त्यामुळे जयंत सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीशीला उत्तर देताना जयंत सिन्हा यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.

पक्षाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला जयंत सिन्हा यांनी उत्तर दिले आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस आदित्य साहू यांच्या पत्राला उत्तर देताना जयंत सिन्हा यांनी हे पत्र लिहिली आहे. दोन पानी पत्र लिहून त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये सिन्हा यांनी पक्षासाठी काम करत राहणार असल्याचं म्हटलं. तसेच मतदान न केल्याच्या आरोपावर जयंत सिन्हा यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केल्याचे सांगितलं. झारखंडच्या हजारीबाग येथील सिन्हा कुटुंब अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. भाजपने जयंत सिन्हा यांना उमेदवारी नाकारुन स्थानिक आमदार मनीष जयस्वाल यांना उभे करण्यात आले. त्यानंतर सिन्हा यांचे पुत्र आशीर सिन्हा हे इंडिया आघाडीच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते. त्यामुळे जयंत सिन्हा काँग्रेसमध्ये जातील असे म्हटलं जात होतं.

"भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती मला सांगायची आहे. मार्च २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, मी सक्रिय निवडणूक जबाबदाऱ्यांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून मी जागतिक वातावरणामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर काम करू शकेन. मी हा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला होता. यासोबतच मी पक्षासोबत काम करत राहणार आहे. गेल्या १० वर्षांपासून मला देश आणि हजारीबागच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्ष नेतृत्वाने मला दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाल्याबद्दल मी नेतृत्वाचे आभार मानले आहेत," असे जयंत सिन्हा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

"पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला,सभेला किंवा बैठकीला मला निमंत्रित करण्यात आले नव्हते. बाबूलाल मरांडीजींना मला कार्यक्रमांमध्ये सामील करून घ्यायचे असते तर ते मला नक्कीच आमंत्रित करू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. २९ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी, माझ्या दिल्लीतील वास्तव्यादरम्यान, मला मनीष जयस्वाल यांनी त्यांचा अर्ज भरण्यासाठी आमंत्रित केले होते. उशीरा माहिती मिळाल्यामुळे, १ मे २०२४ च्या सकाळपर्यंत मला हजारीबागला पोहोचणे शक्य झाले नाही," असेही स्पष्टीकरण सिन्हा यांनी दिलं आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाJharkhandझारखंडJayant Sinhaजयंत सिन्हा