शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 09:44 IST

गांधी कुटुंबीयांच्या वतीने अमेठी आणि रायबरेली या दोन प्रतिष्ठित मतदारसंघांची देखरेख करणारे शर्मा हे प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने यावेळी विश्वास ठेवला आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अमेठी हे फार पूर्वीपासून गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे; परंतु २५ वर्षांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील सदस्य लोकसभेच्या या जागेवरून निवडणूक लढवणार नाही. यंदा काँग्रेसने निष्ठावंत किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे.

गांधी कुटुंबीयांच्या वतीने अमेठी आणि रायबरेली या दोन प्रतिष्ठित मतदारसंघांची देखरेख करणारे शर्मा हे प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने यावेळी विश्वास ठेवला आहे. १९६७ मध्ये मतदारसंघ झाल्यापासून अमेठी गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. तेव्हापासून सुमारे ३१ वर्षे गांधी कुटुंबातील सदस्याने अमेठीचे प्रतिनिधित्व केले आहे. १९७७मध्ये जनता पार्टीचे रवींद्र प्रताप सिंह यांनी संजय गांधी यांना पराभूत केले हाेते. त्यानंतर संजय गांधी यांनी १९८०मध्ये पुन्हा येथून विजय मिळविला.   त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर १९८१मध्ये झालेल्या पाेटनिवडणुकीत राजीव गांधी विजयी झाले हाेते. त्यांच्या हत्येनंतर झालेल्या पाेटनिवडणुकीत सतीश शर्मा विजयी झाले हाेते. २०१९ च्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणींनी राहुल गांधींचा ५५,००० हून अधिक मतांनी पराभव केल्याने काँग्रेसचा बालेकिल्ला भंग झाला होता.

आदेशाचे पालन करणार

मी कायम गांधी कुटुंबाचा सेवक राहिलाे आहे. गांधी कुटुंबाने एका सेवकाला जबाबदारी साेपविली आहे. ती मी पार पाडणार. गांधी कुटुंबानेच अमेठीतून लढावे, हीच माझी इच्छा हाेती. मात्र, त्यांनी आदेश दिला आणि सेवक म्हणून ताे स्वीकार करुन निवडणूक लढविणे, हा माझा धर्म आहे.

- किशाेरी लाल शर्मा, उमेदवार, काॅंग्रेस.

त्यांनी पराभव स्वीकारला

अमेठीतील निवडणूक रिंगणात गांधी कुटुंबाची अनुपस्थिती हे सूचित करते की, काँग्रेसने मतदानापूर्वीच पराभव स्वीकारला आहे. जर त्यांना या जागेवर विजयाची काही शक्यता वाटली असती, तर त्यांनी येथून निवडणूक लढवली असती आणि त्यांच्या वतीने उमेदवार उभे केले नसते.

-स्मृती इराणी, उमेदवार, भाजप.

यापूर्वी बिगर गांधी घरण्याच्या उमेदवार झाला होता पराभूत

nशेवटच्या वेळी १९९८ मध्ये या मतदारसंघातून बिगर-गांधी उमेदवार रिंगणात होते.

nतेव्हा राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे जवळचे सहकारी सतीश शर्मा यांनी निवडणूक लढवली होती; परंतु भाजपच्या संजय सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता.

nसोनिया गांधी यांनी १९९९ मध्ये सिंह यांचा ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव करून ही जागा पुन्हा जिंकली होती.

n२००४ मध्ये राहुल गांधी यांना अमेठीतून उमेदवारी देण्यासाठी सोनिया गांधी लगतच्या रायबरेली मतदारसंघात गेल्या. राहुल यांनी २००४, २००९ आणि २०१४ मध्ये सलग तीन वेळा मतदारसंघातून विजय मिळविला.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४