शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 09:44 IST

गांधी कुटुंबीयांच्या वतीने अमेठी आणि रायबरेली या दोन प्रतिष्ठित मतदारसंघांची देखरेख करणारे शर्मा हे प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने यावेळी विश्वास ठेवला आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अमेठी हे फार पूर्वीपासून गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे; परंतु २५ वर्षांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील सदस्य लोकसभेच्या या जागेवरून निवडणूक लढवणार नाही. यंदा काँग्रेसने निष्ठावंत किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे.

गांधी कुटुंबीयांच्या वतीने अमेठी आणि रायबरेली या दोन प्रतिष्ठित मतदारसंघांची देखरेख करणारे शर्मा हे प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने यावेळी विश्वास ठेवला आहे. १९६७ मध्ये मतदारसंघ झाल्यापासून अमेठी गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. तेव्हापासून सुमारे ३१ वर्षे गांधी कुटुंबातील सदस्याने अमेठीचे प्रतिनिधित्व केले आहे. १९७७मध्ये जनता पार्टीचे रवींद्र प्रताप सिंह यांनी संजय गांधी यांना पराभूत केले हाेते. त्यानंतर संजय गांधी यांनी १९८०मध्ये पुन्हा येथून विजय मिळविला.   त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर १९८१मध्ये झालेल्या पाेटनिवडणुकीत राजीव गांधी विजयी झाले हाेते. त्यांच्या हत्येनंतर झालेल्या पाेटनिवडणुकीत सतीश शर्मा विजयी झाले हाेते. २०१९ च्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणींनी राहुल गांधींचा ५५,००० हून अधिक मतांनी पराभव केल्याने काँग्रेसचा बालेकिल्ला भंग झाला होता.

आदेशाचे पालन करणार

मी कायम गांधी कुटुंबाचा सेवक राहिलाे आहे. गांधी कुटुंबाने एका सेवकाला जबाबदारी साेपविली आहे. ती मी पार पाडणार. गांधी कुटुंबानेच अमेठीतून लढावे, हीच माझी इच्छा हाेती. मात्र, त्यांनी आदेश दिला आणि सेवक म्हणून ताे स्वीकार करुन निवडणूक लढविणे, हा माझा धर्म आहे.

- किशाेरी लाल शर्मा, उमेदवार, काॅंग्रेस.

त्यांनी पराभव स्वीकारला

अमेठीतील निवडणूक रिंगणात गांधी कुटुंबाची अनुपस्थिती हे सूचित करते की, काँग्रेसने मतदानापूर्वीच पराभव स्वीकारला आहे. जर त्यांना या जागेवर विजयाची काही शक्यता वाटली असती, तर त्यांनी येथून निवडणूक लढवली असती आणि त्यांच्या वतीने उमेदवार उभे केले नसते.

-स्मृती इराणी, उमेदवार, भाजप.

यापूर्वी बिगर गांधी घरण्याच्या उमेदवार झाला होता पराभूत

nशेवटच्या वेळी १९९८ मध्ये या मतदारसंघातून बिगर-गांधी उमेदवार रिंगणात होते.

nतेव्हा राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे जवळचे सहकारी सतीश शर्मा यांनी निवडणूक लढवली होती; परंतु भाजपच्या संजय सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता.

nसोनिया गांधी यांनी १९९९ मध्ये सिंह यांचा ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव करून ही जागा पुन्हा जिंकली होती.

n२००४ मध्ये राहुल गांधी यांना अमेठीतून उमेदवारी देण्यासाठी सोनिया गांधी लगतच्या रायबरेली मतदारसंघात गेल्या. राहुल यांनी २००४, २००९ आणि २०१४ मध्ये सलग तीन वेळा मतदारसंघातून विजय मिळविला.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४