शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 08:59 IST

भाजप सत्तेत आल्यास तो राज्यघटना फाडून फेकून देईल. पंतप्रधान, अमित शाह (केंद्रीय गृहमंत्री) आणि त्यांच्या खासदारांनी तसे ठरवले आहे.

भिंड (मध्यप्रदेश): भाजप केंद्रात पुन्हा सत्तेत आला तर तो गरीब, दलित, आदिवासी आणि ओबीसींना अनेक हक्क देणारी राज्यघटना फाडून फेकून देईल, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. ते मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करत होते. राज्यघटनेची प्रत हातात धरून ते म्हणाले की, आताची लोकसभा निवडणूक ही सामान्य निवडणूक नसून दोन विचारसरणींमधील आरपारची लढाई आहे. राज्यघटनेमुळे गरीब, दलित, आदिवासी व ओबीसींना अनेक हक्कांसह मनरेगा, जमीन हक्क, शिक्षण, नोकऱ्यांत आरक्षण व इतरही अनेक गोष्टी दिल्या आहेत. 

भाजप सत्तेत आल्यास तो राज्यघटना फाडून फेकून देईल. पंतप्रधान, अमित शाह (केंद्रीय गृहमंत्री) आणि त्यांच्या खासदारांनी तसे ठरवले आहे. राज्यघटना फेकून द्यावी, असे त्यांना वाटते. जर केंद्रातील सरकार २२-२५ उद्योगपतींना अब्जाधीश बनवू शकते, तर काँग्रेस करोडो महिलांना निश्चितपणे लखपती बनवेल. भिंड लोकसभा (राखीव) मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार संध्या राय यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार फुलसिंग बरैया यांना उमेदवारी दिली आहे. (वृत्तसंस्था

आरक्षणाला विरोध नाही मग सरकारी कंपन्यांचे खासगीकरण का?

यावेळी राहुल यांनी आरक्षणाच्या * मुद्द्यावरून भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्रातील सत्ताधारी आरक्षणाच्या विरोधात नसतील तर ते मग सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे (पीएसयू) खासगीकरण का करत आहे, असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यास महालक्ष्मी योजनेद्वारे कोट्यवधी महिलांना 'लखपती बनवले जाईल. महिलांना लक्षाधीश बनवण्यासाठी सरकार दरवर्षी एक लाख रुपये (रु. ८,५०० दरमहा) त्यांच्या बँक खात्यावर पाठवेल, या घोषणेचा पुनरुच्चार राहुल यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४