शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

'लोकसभा निवडणुकीत भाजपला २०१४ पेक्षा मोठे यश'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 5:10 PM

देशातील जनता नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवू इच्छिते. एनडीए सरकारने देशातील महागाईवर नियंत्रण मिळविल्याचा दावा यावेळी राजनाथ सिंह यांनी केला. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत महागाईचा मुद्दा नसल्याचे सांगत, ते म्हणाले की सरकारने प्रत्येक घटकासाठी काम केले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान शिल्लक असून अर्ध्यापेक्षा अधिक लढाई पार पडली आहे. मात्र सर्वच राजकीय पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. यामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे देखील सामील झाले आहे. राजनाथ यांनी दावा केला की, भाजपला २०१४ पेक्षा यावेळी अधिक जागा मिळतील. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेते ते बोलत होते.

देशातील जनता नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवू इच्छिते. एनडीए सरकारने देशातील महागाईवर नियंत्रण मिळविल्याचा दावा यावेळी राजनाथ सिंह यांनी केला. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत महागाईचा मुद्दा नसल्याचे सांगत, ते म्हणाले की सरकारने प्रत्येक घटकासाठी काम केले. भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या. त्यामुळे भाजपला २०१४ पेक्षा अधिक जागा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळतील.

भाजपसाठी तीन मुद्दे महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये अंत्योदय, दुसरा देशाचा विकास आणि तिसरा म्हणजे देशाची सुरक्षा. या तीनही आघाड्यांवर भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. याचा परिणाम ग्राउंड लेव्हलला दिसून येत, असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

यावेळी राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. पंतप्रधानपदाचा तुमचा उमेदवार कोण, असा सवाल राजनाथ यांनी विरोधकांना केला. लोकशाहीत मतदारांना अंधारात ठेवणे योग्य नसल्याचे सांगत राजनाथ सिंह म्हणाले, पूर्वीच्या युपीए आणि आताच्या एनडीए सरकारच्या कामाची तुलना केल्यास फरक स्पष्ट दिसून येतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी