शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

'एक्झिट पोल'मुळे विरोधक संभ्रमात, तर काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 9:53 AM

काँग्रेसला अशी आस असण्यामागे कारणही तसचं आहे. काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत सर्व्हेत काँग्रेसला १४० च्या जवळपास जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भारतीय जनता पक्ष १८० जागांपर्यंतच मजल मारू शकेल.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी आता एक दिवस शिल्लक आहे. निवडणुकीसंदर्भात आलेल्या एक्झिट पोलनुसार एनडीएला बहुमत मिळणार आहे. एक्झिट पोलमुळे विरोधकांना धडकी भरली असून त्यामुळे विरोधकांच्या मोर्चेबांधणीची गती मंदावली आहे. विरोधक जरी संभ्रमात असले तरी काँग्रेसला मात्र २००४ लोकसभा निवडणूक निकालाच्या पुनरावृत्तीची आशा आहे. २००४ मध्ये काँग्रेसला १४५ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसने इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते.

काँग्रेसला अशी आस असण्यामागे कारणही तसचं आहे. काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत सर्व्हेत काँग्रेसला १४० च्या जवळपास जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भारतीय जनता पक्ष १८० जागांपर्यंतच मजल मारू शकेल. आता एक्झिट पोल आल्यानंतर देखील काँग्रेसनुसार भाजप २०० च्या आतच राहिल. तसेच पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये भाजपला एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात येत असलेल्या जागा मिळणे कठिण आहे. तसेच ज्या राज्यात २०१४ मध्ये भाजप आघाडीवर होते, तिथे भाजपला नुकसान होणे निश्चित असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा करण्यात आलेला दावा काँग्रेसनेच नव्हे तर बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने देखील फेटाळला आहे. सपाचे महासचिव रामगोपाल यादव म्हणाले की, २३ मे रोजी सर्व एक्झिट पोल कोसळणार आहेत. तर बहुजन समाज पक्षाच्या सतीश चंद मिश्रा यांनी एक्झिट पोलच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसरीकडे तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आपला एक्झिट दाखवून विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. नायडू यांच्यानुसार काँग्रेसला १२९ आणि भाजपला १७९ जागा मिळतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBJPभाजपाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी