शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Lok Sabha Election 2019 : पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा ठेवणारे चंद्राबाबू मुख्यमंत्रीपदही गमावणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:41 AM

आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस क्लिन स्वीप करत आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही चंद्राबाबूंना सपाटून मार खावा लागत आहे.

नवी दिल्ली - एक्झिट पोल आल्यानंतर तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आंध्रप्रदेशातील तेलगू देसम पक्षांचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये टीडीपीला २५ पैकी एकाच जागेवर आणि विधानसभेच्या १७५ जागांपैकी टीडीपीला केवळ २९ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांच्या मुख्यमंत्रपदावर टाच येण्याची शक्यता झाली आहे.

आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस क्लिन स्वीप करत आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही चंद्राबाबूंना सपाटून मार खावा लागत आहे. लोकसभा निकालांमध्ये आंध्र प्रदेशातील २५ पैकी २४ जागांवर जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेसला आघाडी मिळाली असून तेलगू देसम केवळ विजयवाडा मतदार संघात आघाडीवर  आहे.

निकालांमधील ट्रेंड कायम राहिल्यास आंध्रप्रदेशात वायएसआर काँग्रेसची आगेकूच रोखणं चंद्राबाबूंना अवघड जाईल, असं दिसत आहे. आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्यात चंद्राबाबू अपयशी ठरल्याने त्यांच्याविरोधात नाराजी होती. त्यातच त्यांनी काँग्रेसलाही चार हात दूर ठेवल्याने मतांची मोठी विभागणी झाल्याने चंद्राबाबूंना फटका बसत असल्याच मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

 

विधानसभा निवडणुकीत टीडीपीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. येथील १७५ विधानसभा मतदार संघापैकी १४५ जागांवर वायएसआर काँग्रेसने आघाडी घेतली असून टीडीपी २९ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे चंद्राबाबू नायडू यांच्यावर मुख्यमंत्री पद गमावण्याची वेळ येणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टी