शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत महाराष्ट्राकडे लक्ष वेधले

By admin | Updated: December 18, 2014 05:01 IST

रंगाबाद येथे इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला दर क्विंटल सात हजार रूपये मोबदला

नवी दिल्ली : औरंगाबाद येथे इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला दर क्विंटल सात हजार रूपये मोबदला मिळावा, कोल्हापुरात पासपोर्ट कार्यालय, हिंगोली जिल्ह्यातील कनेरगा ते वारंगा या राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती, मुंबई - बडोदा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाऐवजी सांकरी महामार्ग करावा या व अन्य मागण्यांनी लोकसभेतील शून्यप्रहरावर संपूर्ण महाराष्ट्राची छाया होती. मार्ग हे जीवनरेषा असतात, पण काही रस्ते मृत्यूचे सापळे ठरत आहेत, तेव्हा याकडे लक्ष द्या, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उत्पादन खर्च आणि मिळणारा मोबदला याचा ताळमेळ सांधा, अशा सूचनाही सरकारला धडाक्यात केल्याने आजच्या शून्यप्रहराने राज्याकडे केंद्राचे लक्ष वेधण्यात आले.कोल्हापुरात पासपोर्ट कार्यालयकोल्हापूरमध्ये २०११ पर्यंत पासपोर्ट कार्यालय होते. त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये खाजगीकरणात टीसीएस कंपनीकडे ते चालवायला दिले. तेव्हापासून ते आजतागायत बंद आहे. २५० किलोमीटर दूर असलेल्या पुण्यातून संपूर्ण कारभार चालतो, असे सांगून खा. धनंजय महाडिक म्हणाले, एका पासपोर्टसाठी एका कुटुंबाची अपॉइंटमेंट वेगवेगळ््या दिवशी ठरते. पैसा, वेळ खर्च होतो. त्यामुळे कोल्हापुरातील कार्यालय पुन्हा सुरू करावे.हिंगोलीतील महामार्गाची दुर्दशादेशातील सर्वात वाईट महामार्ग आपल्या हिंगोली जिल्ह्यातील कनेरगा- वारंगा महामार्ग आहे, असे सांगून खा. राजीव सातव म्हणाले, या महामार्गाच्या दुरुस्तीबद्दल यापूर्वी दोनवेळा आपण सदनात बोललो आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंत्यांनी केंद्रातील महासंचालकांनी याबाबत कळवून ७० कोटी रूपयांत दुरूस्ती होऊ शकते, असे म्हटले. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या काही बैठकाही झाल्या, पण हा महामार्ग दुरूस्त केला जात नाही. मागील वर्षभरात एक हजारापेक्षा अधिक अपघात या मार्गावर झाले आहेत. सांकरी मार्ग करामुंबई- अहमदाबाद महामार्गावर आठ पदरी सांकरी महामार्गाचे काम सुरू आहे, त्याला जोडून पुन्हा मुंबई- बडोदा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित असून या महामार्गाची गरज नाही असे खा. चिंतामण वानगा यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)