शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

श्रीमंत खासदारांनी वेतनाचा त्याग करून आदर्श ठेवावा, वरुण गांधी यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 2:17 AM

श्रीमंत खासदारांनी विद्यमान लोकसभेच्या उर्वरित कालावधीतील वेतनाचा त्याग करण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा तसेच खासदारांचे वेतन व भत्ते त्यांनी स्वत: न ठरविता त्यासाठी स्वतंत्र वस्तुनिष्ठ पद्धत प्रस्थापित करावी, असे आवाहन भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : श्रीमंत खासदारांनी विद्यमान लोकसभेच्या उर्वरित कालावधीतील वेतनाचा त्याग करण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा तसेच खासदारांचे वेतन व भत्ते त्यांनी स्वत: न ठरविता त्यासाठी स्वतंत्र वस्तुनिष्ठ पद्धत प्रस्थापित करावी, असे आवाहन भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केले आहे.खासदारांचे वेतन व भत्ते याविषयी कायदा असून त्यात वेळोवेळी दुरुस्ती मंजूर करून खासदार मंडळी आपले वेतन वाढवून घेत असतात. आताही सध्याचे वेतन दुप्पट व्हावे, अशी खासदारांची मागणी आहे.या पार्श्वभूमीवर वरुण गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना हा प्रस्ताव दिला आहे.खासदार वरुण गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना उद्देशून लिहितात की, श्रीमंत खासदारांनी विद्यमान १६ व्या लोकसभेच्या उर्वरित कालावधीसाठी आपल्या वेतनाचा त्याग करावा म्हणून मोहीम सुरु करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. या कालावधीतील खासदारांचे वेतन व भत्ते रद्द करण्यात यावेत हे त्यादृष्टीने महत्वाचे पाऊल ठरेल. देशात आर्थिक विषमतेची दरी दिवसेंदिवस रुंदावते आहे. एकुण राष्ट्रीय संपत्तीपैकी ६० टक्के संपत्ती एक टक्का धनिकांकडे एकवटली आहे. १९३० मध्ये हेच प्रमाण २१ टक्के इतके होते. भारतीय लोकशाहीसाठी हे घातक आहे. या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींनी अधिक गांभीर्याने बघून सामाजिक संवेदनशीलता दाखवायला हवी, असे वरुण गांधी पत्रात म्हणतात.दरमहा पन्नास हजार रुपये वेतन तसेच मतदारसंघासाठी ४५ हजार रुपये भत्ता तसेच अन्य भत्ते असे प्रत्येक खासदाराला मिळतात. सरकार प्रत्येक खासदारावर दरमहा २ लाख ७० हजार रुपये खर्च करत असते. लोकसभेतील ५४३ खासदारांवर २०१६ या वर्षात सरकारने वेतन व भत्त्यांपोटी १७६ कोटी रुपये खर्च केले.सधन खासदारांनी एवढे वेतन व भत्ते घेणे सयुक्तिक नाही, असे सुचविताना पत्रात वरुण गांधी यांनी आकडेवारी दिली आहे. २००९ साली ज्यांच्याकडे १० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे असे ३१९ लोकसभा खासदार होते. आता ही संख्या ४४९ झाली आहे. लोकसभेतील २४ टक्के खासदारांच्या एकुण संपत्तीचे मुल्य १०० दशलक्ष रुपये इतके आहे.अभ्यासाठी समिती नेमाज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसंबंधी इंग्लंडमध्ये जशी वैधानिक समिती नेमण्यात आली आहे, त्याच धर्तीवर खासदारांचे वेतन रद्द करणे कितपत सयुक्तिक ठरेल याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी अशी सूचनाही वरुण गांधी यांनी केली आहे.खासदारांच्या वेतनामध्ये वाढ करणे खरोखरच आवश्यक आहे का याचा अभ्यास या वैधानिक समितीने करावा, असे त्यांना वाटते.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाIndiaभारत