शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

पत्नीला सोडून परदेशात पळालेल्या NRI नवऱ्याला करणार फरार घोषित- मनेका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 10:59 AM

पत्नीला भारतात सोडून परदेशात जाणाऱ्या व कोर्टाकडून तीन समन्स बजावूनही हजर न राहणाऱ्या पतीला फरार घोषित केलं जाणार आहे.

नवी दिल्ली- पत्नीला भारतात सोडून परदेशात पळून जाणाऱ्या अनिवासी भारतीयांसदर्भात केंद्र सरकार कडक पावलं उचलण्याची तयारी करतं आहे. पत्नीला भारतात सोडून परदेशात जाणाऱ्या व कोर्टाकडून तीन समन्स बजावूनही हजर न राहणाऱ्या पतीला फरार घोषित केलं जाणार आहे. सरकार कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहेत.  पत्नीला भारतात सोडून परदेशात जाणाऱ्या व कोर्टाकडून तीन समन्स बजावूनही हजर न राहणाऱ्या पतीला फरार घोषित केलं जाईल. इतकंच नाही, तर भारतातील पतीच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या संपत्तीलाही सील केलं जाऊ शकतं. केंद्रीय महिला-बाल विकास मंत्रायलाने याबरोबरच बाल लैंगिक शोषण थांबविण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. सीआरपीसीमधील बदलानंतर लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यासाठी 1 वर्षापर्यंतचा गुन्हा दाखल केला जाईल. पीडित लहान असताना त्याचं लैंगिक शोषण झालं व पीडित आता बालिक असेल तर त्याचं वेळी गुन्हा दाखल केला जाईल. परराष्ट्र मंत्रालयाने एनआरआय नवरदेवांच्या फरवणुकीला चाप बसविण्यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी कायदा मंत्रायलाला पत्र लिहिलं आहे. विदेशात स्थायिक असलेला पती त्याच्या लग्नानंतर पत्नीला भारतात सोडून निघून जातो. कोर्टाकडून नोटीस पाठविली जाऊनही तो पुन्हा हजर होत नाही. अशा घटनांवर चाप बसविण्यासाठी या लोकांना फरार घोषित केलं जाईल आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवरील फरारांच्या यादीत सामिल केलं जाईल, असं महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी म्हंटलं. 

बाल लैंगिक शोषणाच्या कायद्यात बदल करण्याच्या मुद्द्यावर मेनका गांधी यांनी म्हंटलं की, लहानपणी घटना घडली असताना पीडित बालिक झाल्यावरही त्याला न्याय मिळविण्याच्या अधिकाप आहे. यामध्ये काही जोखीम आहेत तसंच खोटी प्रकरण दाखल होण्याचीही शक्यता असल्याने त्यावर विचार केला जाणार आहे. बाल लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सर्वांना न्याय मिळवून देणं, हे आमचं उद्दिष्ट्यं असल्याचं मेनका गांधी यांनी म्हंटलं.  

टॅग्स :Maneka Gandhiमनेका गांधी