शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मस्तच! मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च देणार सरकार पण "हे" कार्ड असेल तरच; जाणून घ्या प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 13:21 IST

Government Scheme Benefits for Labour : मुलांच्या शिक्षणापासून अगदी लग्नापर्यंतचा सर्व खर्च सरकार देण्याची हमी देण्यात आली आहे. पण यासाठी संबंधित कामगारांना नोंदणी करणं आवश्यक आहे.

नवी दिल्ली - कामगारांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र अनेक योजनांची पूर्ण माहिती कामागारांना मिळतच नाही. काही योजना असतात ज्या कामगारांच्या खूप उपयोगाच्या असतात. कामगारांना त्याचा मोठा फायदा होतो. अशीच एक योजना उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली आहे. या अंतर्गत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणापासून अगदी लग्नापर्यंतचा सर्व खर्च सरकार देण्याची हमी देण्यात आली आहे. पण यासाठी संबंधित कामगारांना नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर विविध सुविधांचा लाभ मिळतो. 

कामगारांना नोंदणी करण्यासाठी आणि ‘लेबर कार्ड’ बनवण्यासाठी काही निकष आहेत. यामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष असायला हवी. हे कार्ड फक्त गरीब प्रवर्गातील कामगारांच्या कुटुंबानाच दिलं जातं. या अंतर्गत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरविली जाते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यासाठी राज्य सरकारची अधिकृत वेबसाईट http://www.uplabour.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करावा लागतो.

आवश्यक कागदपत्रे 

कामगार कार्ड बनविण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत, ज्याच्या आधारावर कामगार कार्ड बनविता येईल. कामगार कार्ड बनविण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आधार कार्ड आहे. आधार कार्ड अनिवार्य आहे. याचा उपयोग करुन कामगार कार्ड तयार करता येतंकोणत्याही कुटुंबात कोणत्याही एकाच व्यक्तीचं कामगार कार्ड बनविण्यात येतं. त्यामुळे तुम्हाला सर्व महत्वाची कागदपत्रे जमा करावी लागतील.

ऑनलाईन अर्ज करताना काही कागदपत्रं अपलोड करावी लागतात. कामगाराचे स्वतःचे बँक खाते असायला हवे. यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत पाठविली जाईल. मोबाईल नंबर असायला हवा जेणेकरून या योजनेच्या संदर्भात आपणास काही माहिती दिली जाईल किंवा पैसे जमा झाल्याचा ओटीपी पाठवला जातो. रेशन कार्ड, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो आणि कामगार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ज्या व्यक्तीने एका वर्षात 90 दिवस काम केले तोच या योजनेच्या अंतर्गत नोंदणी करू शकतो.

योजनेचा लाभ

या योजनेचा लाभ देशातील प्रत्येक राज्यात मिळत आहे. संबंधित राज्य सरकारांनी त्यासाठी विविध नियमावली बनवल्या आहेत. या नियमानुसारच कामगारांना लेबर कार्डसाठी अर्ज करावा लागतो. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने कामगारांसाठी मोफत अन्न योजना चालू केली. त्यातही लेबर कार्डचा उपयोग झाला. या कार्डधारकांना 2 रुपये किलो दराने गहू मिळाले.

या योजनेच्या माध्यमातून कामगार आपल्या मुलांच्या शिष्यवृत्ती, प्रसूती दरम्यान होणारा खर्च, शक्ती योजना घरकुल योजना, गंभीर आजारपणाच्या उपचारासाठी या कार्डचा फायदा होऊ शकतो. केंद्र किंवा राज्य सरकारच्यावतीने चालवली जाणारी घरकुल योजनेचा फायदाही या कार्ड धारकांना मिळतो. सरकारच्या वतीने कामगारांची एक पूर्ण यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात सांगितलं आहे की या योजनांचा कोण कोण फायदा घेऊ शकते.

या योजनांचा फायदा कोण घेऊ शकतं?

कारपेंटर, मिस्त्री, रस्ते तयार करणारे कामगार, लोहार, बिल्डिंग कामगार, चौकीदार, विटभट्टीवर काम करणारे कामगार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, रंगांचे काम करणारे पेंटर, दगड तोडणारे कारागिर इत्यादींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेच्या अंतर्गत कार्ड बनू शकतात आणि सरकारी मदतीचा लाभ घेता येऊ शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :LabourकामगारEducationशिक्षणmarriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत