शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Kerala Floods; 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे', Paytm च्या मालकास नेटीझन्सने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 3:17 PM

Kerala Floods; केरळमध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात आत्तापर्यंत 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वरुणराजाला थांबण्यासाठी प्रार्थना केली जात असून देशभरातून केरळसाठी मदत पाठविण्यात येत आहे.

मुंबई - केरळमध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात आत्तापर्यंत 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे पाऊस थांबण्यासाठी वरुणराजाला प्रार्थना केली जात आहे, तर दुसरीकडे देशभरातून केरळसाठी मदत पाठविण्यात येत आहे. या कामात दानशूर व्यक्तीही आपले कर्तव्य समजून पुढे येत आहेत. मात्र, पेटीएम कंपनीचे मालक विजय शेखर शर्मा यांनी केरळच्या जनतेची खिल्ली उडविण्याचाच प्रयत्न केला आहे. जवळपास 12 हजार कोटींचे मालक असलेल्या शेखर यांनी 10 हजार रुपयांची तुटपूंजी मदत केरळसाठी दिली आहे. विशेष म्हणजे पेटीएमद्वारे ही मदत देताना त्यांनी मदतीसाठी लोकांना पेटीएमचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.  त्यामुळे आपल्या ब्रँडची जाहिरात करताना त्यांनी खालची पातळी गाठल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. केंद्र सरकारने केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर केली असून इतर राज्यांनीही आपापल्यापरीने मदत दिली आहे. महाराष्ट्र सरकारने 20 कोटींची मदत दिली. तर राज्यातील काँग्रेस आमदार आणि खासदारांनी एक महिन्याचा पगार मदत म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. तसेच इतर राज्यातील इतर राजकीय पक्षांतील नगरसेवक ते खासदार सर्वच मदतीसाठी सरसावले आहेत. सहकारी संस्था, उद्योजक आणि व्यक्तींकडूनही केरळला मदत करण्यात येत आहे. मात्र, पेटीएमचे संस्थापक आणि देशातील मोठे उद्योजक असलेल्या विजय शेखर शर्मा यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून 10 हजार रुपये दिले आहेत. विशेष म्हणजे ही मदत त्यांनी पेटीएमच्या माध्यमातून केली असून लोकांनीही पेटीएमचा वापर करुन मदत करावी, असे आवाहनही केले आहे. म्हणजेच, एकप्रकारे विजय शेखर यांनी केवळ 10 हजार रुपयांत स्वत:च्या कंपनीची लाखो रुपयांची जाहिरातच केली आहे. शर्मा यांनी केरळसाठी 10 हजार रुपये मदत केल्याचा स्क्रीनशॉटही ट्विटरवरुन शेअर केला. त्यानंतर, विजय शेखर यांनी नेटीझन्सने चांगलेच सुनावले आहे. 12 हजार कोटींची संपत्ती असलेल्या शर्मा यांनी केलेली तुटपूंजी मदत म्हणजे केरळवासियांची चेष्टाच असल्याचे युजर्संने म्हटले आहे. विशेष म्हणजे केवळ 48 तासांतच 4 लाख पेटीएम युजर्संने केरळसाठी पेटीएमद्वारे 10 कोटींचा निधी जमा केला आहे. मात्र, विजय शेखर यांनी 10 हजार दिल्याने युजर्सं चांगलेच खवळले आहेत. विजय शेखर तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुमच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी एका आपत्कालीन घटनेचे सहाय्य घेणे अतिशय खालच्या स्तराचे काम असल्याचे हिमिका चौधरी नावाच्या युजर्सने म्हटले आहे. तर अनेक युजर्संनेही तशाच भाषेत विजय शेखर यांना सुनावले आहे. आमच्याकडे गणपतीची पट्टीही जास्त दिली जाते, तुम्ही अब्जाधीश असून केवळ 10 हजार रुपये देता, असेही नेटीझन्सने सुनावले आहे.  

 

दरम्यान, केरळमध्ये शुक्रवार आणि शनिवारी पाऊस कमी झाल्यानं 14 जिल्ह्यांना दिलेला रेड अलर्ट हटवण्यात आला होता. मात्र, 9 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच हा रेड अलर्ट हटवण्यात आला आहे. पाऊस ओसरल्यानं बचावकार्याला वेग आला आहे. सरकार आणि एनडीआरएफची टीम मिळून बचावकार्य राबवत आहेत. एर्नाकुलम, पथनमथिट्टा आणि अलप्पुझा जिल्ह्यांतील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुसळधार पावसानं आलेल्या पुरात आतापर्यंत 350 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Paytmपे-टीएमAdvertisingजाहिरातTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडियाKerala Floodsकेरळ पूर