शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
“या अधिवेशनात...”; विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी
3
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
4
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
5
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
6
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
7
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
8
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
9
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
10
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
11
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
12
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
13
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
14
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
15
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
16
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
17
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
18
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
19
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
20
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसमधील बहुतेक नेते भाजपाच्या कॉलची वाट पाहतायेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 14:21 IST

पी. विजयन यांनी काँग्रेस पक्षाने १९८० च्या दशकात केलेल्या एका विधानाची आठवण करून दिली.

ठळक मुद्देकेरळ सरकारविरोधात १५ वर्षात पहिल्यांदाच अविश्वासदर्शक ठराव मांडला गेला.

तिरुअनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सोमवारी केरळ विधानसभा सत्रात अविश्वास  ठरावावर झालेल्या चर्चेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसची अवस्था बिकट आहे आणि बहुतेक नेते भाजपाच्या कॉलची वाट पाहत आहेत, असे पी. विजयन यांनी म्हटले.

काँग्रेस आपले नेतृत्व ठरविण्यास असमर्थ आहे, तर पक्षाचे वरिष्ठ नेते एकमेकांना 'भाजपाचे एजंट' म्हणत आहेत. पक्षाचे बहुतेक नेते भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपाच्या कॉलची वाट पाहात आहेत, असा दावा पी. विजयन यांनी केला आहे.

काँग्रेसमधील नेतृत्त्वावरून घडलेल्या संकटावर पी. विजयन यांनी निशाणा साधला. काँग्रेसच्या नेतृत्वात दोन गटांमध्ये फूट पडली असून, त्यावर सोमवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह २० हून अधिक सदस्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष निवडीबाबत पत्र लिहिले होते. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत एक गट या मागणीवर ठाम होता तर दुसरा गट स्वतःच गांधी कुटुंबातील विश्वास टिकवून ठेवण्याच्या बाजूने होता.

यावरुन, केरळ विधानसभेत मुख्यमंत्री पी. विजयन यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. "एकीकडे त्यांनी येथे अविश्वास प्रस्ताव दिला आहे, तर दुसरीकडे दिल्लीत अविश्वास प्रस्ताव चालला आहे. तेथे त्यांचे नेते एकमेकांना भाजपा एजंट म्हणत आहेत. ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांना आपण भाजपाचे एजंट नाही असे सर्वांसमोर सांगावे लागले. मात्र नंतर त्यांनी आपले म्हणणे मागे घेतले," असे पी. विजयन यांनी म्हटले.

याचबरोबर, पी. विजयन यांनी काँग्रेस पक्षाने १९८० च्या दशकात केलेल्या एका विधानाची आठवण करून दिली. ज्यावेळी काँग्रेसकडून सांगण्यात आले होते की, केरळमध्ये लेफ्ट पार्टी सत्तेत पुन्हा कधीच येणार नाही. मात्र, त्यानंतर लेफ्ट पार्टी सत्तेत चारवेळी आली, असे पी. विजयन यांनी म्हटले.

"काँग्रेसमध्ये नेता निवडण्याची क्षमता नाही. वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहून नेतृत्व बदलण्याची मागणी केली. सोनिया गांधी राजीनामा देण्यास सहमत होत्या. राहुल गांधी यांनी यापूर्वीच पदावर येण्यास नकार दिला आहे. या लोकांनी राजकीय पक्ष म्हणून कधी भूमिका घेतली आहे का?", असा सवाल पी. विजयन यांनी केला.

दरम्यान, केरळ विधानसभेत एलडीएफ सरकारविरोधात काँग्रेसप्रणित यूडीएफने अविश्वासदर्शक ठराव आणला. मात्र, एलडीएफच्या बहुमतामुळे अविश्वासदर्शक ठरावाने टिकाव धरला नाही. केरळ सरकारविरोधात १५ वर्षात पहिल्यांदाच अविश्वासदर्शक ठराव मांडला गेला.

आणखी बातम्या...

- स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...  

"राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    

महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा    

बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    

गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    

- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    

- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!! 

टॅग्स :congressकाँग्रेसKeralaकेरळBJPभाजपा