शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

"काँग्रेसमधील बहुतेक नेते भाजपाच्या कॉलची वाट पाहतायेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 14:21 IST

पी. विजयन यांनी काँग्रेस पक्षाने १९८० च्या दशकात केलेल्या एका विधानाची आठवण करून दिली.

ठळक मुद्देकेरळ सरकारविरोधात १५ वर्षात पहिल्यांदाच अविश्वासदर्शक ठराव मांडला गेला.

तिरुअनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सोमवारी केरळ विधानसभा सत्रात अविश्वास  ठरावावर झालेल्या चर्चेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसची अवस्था बिकट आहे आणि बहुतेक नेते भाजपाच्या कॉलची वाट पाहत आहेत, असे पी. विजयन यांनी म्हटले.

काँग्रेस आपले नेतृत्व ठरविण्यास असमर्थ आहे, तर पक्षाचे वरिष्ठ नेते एकमेकांना 'भाजपाचे एजंट' म्हणत आहेत. पक्षाचे बहुतेक नेते भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपाच्या कॉलची वाट पाहात आहेत, असा दावा पी. विजयन यांनी केला आहे.

काँग्रेसमधील नेतृत्त्वावरून घडलेल्या संकटावर पी. विजयन यांनी निशाणा साधला. काँग्रेसच्या नेतृत्वात दोन गटांमध्ये फूट पडली असून, त्यावर सोमवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह २० हून अधिक सदस्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष निवडीबाबत पत्र लिहिले होते. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत एक गट या मागणीवर ठाम होता तर दुसरा गट स्वतःच गांधी कुटुंबातील विश्वास टिकवून ठेवण्याच्या बाजूने होता.

यावरुन, केरळ विधानसभेत मुख्यमंत्री पी. विजयन यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. "एकीकडे त्यांनी येथे अविश्वास प्रस्ताव दिला आहे, तर दुसरीकडे दिल्लीत अविश्वास प्रस्ताव चालला आहे. तेथे त्यांचे नेते एकमेकांना भाजपा एजंट म्हणत आहेत. ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांना आपण भाजपाचे एजंट नाही असे सर्वांसमोर सांगावे लागले. मात्र नंतर त्यांनी आपले म्हणणे मागे घेतले," असे पी. विजयन यांनी म्हटले.

याचबरोबर, पी. विजयन यांनी काँग्रेस पक्षाने १९८० च्या दशकात केलेल्या एका विधानाची आठवण करून दिली. ज्यावेळी काँग्रेसकडून सांगण्यात आले होते की, केरळमध्ये लेफ्ट पार्टी सत्तेत पुन्हा कधीच येणार नाही. मात्र, त्यानंतर लेफ्ट पार्टी सत्तेत चारवेळी आली, असे पी. विजयन यांनी म्हटले.

"काँग्रेसमध्ये नेता निवडण्याची क्षमता नाही. वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहून नेतृत्व बदलण्याची मागणी केली. सोनिया गांधी राजीनामा देण्यास सहमत होत्या. राहुल गांधी यांनी यापूर्वीच पदावर येण्यास नकार दिला आहे. या लोकांनी राजकीय पक्ष म्हणून कधी भूमिका घेतली आहे का?", असा सवाल पी. विजयन यांनी केला.

दरम्यान, केरळ विधानसभेत एलडीएफ सरकारविरोधात काँग्रेसप्रणित यूडीएफने अविश्वासदर्शक ठराव आणला. मात्र, एलडीएफच्या बहुमतामुळे अविश्वासदर्शक ठरावाने टिकाव धरला नाही. केरळ सरकारविरोधात १५ वर्षात पहिल्यांदाच अविश्वासदर्शक ठराव मांडला गेला.

आणखी बातम्या...

- स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...  

"राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    

महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा    

बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    

गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    

- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    

- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!! 

टॅग्स :congressकाँग्रेसKeralaकेरळBJPभाजपा