केरळात पावसाने २८ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 03:35 IST2018-07-20T03:34:57+5:302018-07-20T03:35:07+5:30

केरळात पावसाशी संंबंधित दुर्घटनांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या २८ झाली आहे.

In Kerala, 28 people died due to rains | केरळात पावसाने २८ जणांचा बळी

केरळात पावसाने २८ जणांचा बळी

तिरुवनंतपूरम : केरळात पावसाशी संंबंधित दुर्घटनांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या २८ झाली आहे. गत दहा दिवसांपासून राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असून शिबिरात आश्रयाला असलेल्या नागरिकांची संख्या ८६ हजारांवर गेली आहे. आगामी तीन दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. एर्नाकुलम, इडुक्की, कोझिकोड, वायनाडमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: In Kerala, 28 people died due to rains

टॅग्स :Deathमृत्यू