शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

टायमिंग! विरोधकांची बिहारमध्ये बैठक, केसीआर यांच्या मुलाने दिल्लीत अमित शहा, राजनाथ सिंहांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 14:48 IST

देशातील १५ विरोधी पक्षांची आज बिहारमध्ये बैठक सुरू आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथे आज विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे. देशातील १५ विरोधी पक्ष या बैठकीत उपस्थित आहेत. तर दुसरीकडे भारत राष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष आणि तेलंगणाचे उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री केटी रामाराव हे गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी शुक्रवारी दिल्लीला रवाना झाले आहेत. येथे ते दोन दिवस राहणार आहेत. ते पहिल्यांदाच अमित शहांना भेटणार आहेत.

"हा 'मोदी हटाव' नव्हे तर 'परिवार बचाव' मेळावा, अन् आश्चर्य म्हणजे उद्धव ठाकरे...";

केटीआर यांनी जून २०२२ मध्ये दिल्लीला शेवटचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली होती. तेव्हापासून केटीआर आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव तेलंगणाला सावत्र आईची वागणूक दिल्याचा आरोप करत केंद्रावर टीका करत आहेत.

एका बीआरएस नेत्यांना या संदर्भात प्रतिक्रिया दिली. ही भेट केवळ तेलंगणाशी संबंधित प्रकल्पाच्या विलंबा संदर्भात असल्याचं त्यांनी म्हटले आहे.  मात्र, या भेटीच्या वेळेवरून राजकीय वातावरण तापले आहे. कारण आज पाटणा येथे विविध विरोधी पक्ष एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्याची रणनीती आखणार आहेत.

पटना येथे विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीसाठी केसीआर यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी बुधवारी सांगितले होते की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध लढण्याबाबत बीआरएस अध्यक्षांकडून कोणतेही स्पष्ट संकेत मिळाले नाहीत.

एका बीआरएस नेत्याने सांगितले की, केटीआर केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीत राजकारणावर चर्चा करणार नाहीत. “बीआरएसचे कार्याध्यक्ष फक्त सिकंदराबाद कॅन्टोन्मेंटमध्ये उड्डाणपूल आणि स्कायवे बांधण्यासाठी संरक्षण जमिनीचे वाटप, रसूलपुरा येथे रस्ता विस्तारीकरणासाठी एमएचएच्या जमिनीचे वाटप, वारंगलमधील ममनूर येथील विमानतळाचा विकास इत्यादी मुद्दे केंद्राकडे आहेत. मेट्रो रेल्वेच्या बाबतही चर्चा होणार आहे.

दरम्यान, तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणाशी संबंधित विकासकामे पुढे नेण्याच्या नावाखाली केंद्रीय मंत्र्यांची, विशेषत: अमित शहा यांची भेट घेण्यासाठी केटीआरच्या दिल्ली दौऱ्यामागे एक राजकीय असल्याचे तेलंगण भाजपचे अध्यक्ष बंदी संजय यांनी सांगितले. ते म्हणाले, “केटीआर केंद्रातील भाजप सरकारला दोष देऊ इच्छित असल्याचे दिसते. राज्याच्या विकास कार्यक्रमात केंद्र सहकार्य करत नसल्याची प्रसिद्धी त्यांना द्यायची आहे, असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेसTelanganaतेलंगणाAmit Shahअमित शाह