शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

टायमिंग! विरोधकांची बिहारमध्ये बैठक, केसीआर यांच्या मुलाने दिल्लीत अमित शहा, राजनाथ सिंहांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 14:48 IST

देशातील १५ विरोधी पक्षांची आज बिहारमध्ये बैठक सुरू आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथे आज विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे. देशातील १५ विरोधी पक्ष या बैठकीत उपस्थित आहेत. तर दुसरीकडे भारत राष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष आणि तेलंगणाचे उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री केटी रामाराव हे गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी शुक्रवारी दिल्लीला रवाना झाले आहेत. येथे ते दोन दिवस राहणार आहेत. ते पहिल्यांदाच अमित शहांना भेटणार आहेत.

"हा 'मोदी हटाव' नव्हे तर 'परिवार बचाव' मेळावा, अन् आश्चर्य म्हणजे उद्धव ठाकरे...";

केटीआर यांनी जून २०२२ मध्ये दिल्लीला शेवटचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली होती. तेव्हापासून केटीआर आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव तेलंगणाला सावत्र आईची वागणूक दिल्याचा आरोप करत केंद्रावर टीका करत आहेत.

एका बीआरएस नेत्यांना या संदर्भात प्रतिक्रिया दिली. ही भेट केवळ तेलंगणाशी संबंधित प्रकल्पाच्या विलंबा संदर्भात असल्याचं त्यांनी म्हटले आहे.  मात्र, या भेटीच्या वेळेवरून राजकीय वातावरण तापले आहे. कारण आज पाटणा येथे विविध विरोधी पक्ष एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्याची रणनीती आखणार आहेत.

पटना येथे विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीसाठी केसीआर यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी बुधवारी सांगितले होते की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध लढण्याबाबत बीआरएस अध्यक्षांकडून कोणतेही स्पष्ट संकेत मिळाले नाहीत.

एका बीआरएस नेत्याने सांगितले की, केटीआर केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीत राजकारणावर चर्चा करणार नाहीत. “बीआरएसचे कार्याध्यक्ष फक्त सिकंदराबाद कॅन्टोन्मेंटमध्ये उड्डाणपूल आणि स्कायवे बांधण्यासाठी संरक्षण जमिनीचे वाटप, रसूलपुरा येथे रस्ता विस्तारीकरणासाठी एमएचएच्या जमिनीचे वाटप, वारंगलमधील ममनूर येथील विमानतळाचा विकास इत्यादी मुद्दे केंद्राकडे आहेत. मेट्रो रेल्वेच्या बाबतही चर्चा होणार आहे.

दरम्यान, तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणाशी संबंधित विकासकामे पुढे नेण्याच्या नावाखाली केंद्रीय मंत्र्यांची, विशेषत: अमित शहा यांची भेट घेण्यासाठी केटीआरच्या दिल्ली दौऱ्यामागे एक राजकीय असल्याचे तेलंगण भाजपचे अध्यक्ष बंदी संजय यांनी सांगितले. ते म्हणाले, “केटीआर केंद्रातील भाजप सरकारला दोष देऊ इच्छित असल्याचे दिसते. राज्याच्या विकास कार्यक्रमात केंद्र सहकार्य करत नसल्याची प्रसिद्धी त्यांना द्यायची आहे, असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेसTelanganaतेलंगणाAmit Shahअमित शाह