शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

केसीपार्क मध्ये ७ दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प जलवाहिनी फुटली: दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष

By admin | Published: May 31, 2016 1:54 AM

जळगाव: येथील कानळदा रोड भागात नालेसफाई करताना जेसीबीचा धक्का लागून नाल्यातून गेलेली जलवाहिनी फुटल्याने के.सीपार्क, त्रिभुवन कॉलन,विजयनगरसह परिसरात नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तब्बल ५ दिवस उलटूनदेखील दुरुस्तीसाठी मनपाला मुहर्त मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

जळगाव: येथील कानळदा रोड भागात नालेसफाई करताना जेसीबीचा धक्का लागून नाल्यातून गेलेली जलवाहिनी फुटल्याने के.सीपार्क, त्रिभुवन कॉलन,विजयनगरसह परिसरात नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तब्बल ५ दिवस उलटूनदेखील दुरुस्तीसाठी मनपाला मुहर्त मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कानळदा रोडवरील नाल्यांची जेसीबी व्दारे साफसफाई करीत असताना पाच दिवसापूर्वीच जलवाहिनी फुटली आहे. या भागात २४ मे रोजी पाणीपुरवठा झाला होता. त्यानंतर २७ मे रोजी या भागात पाणी पुरवठा होणार होता त्याच दिवशी नालेसफाई करणार्‍या जेसीबीचा नाल्यातून गेलेल्या जलवाहिनीला धक्का लागल्याने जलवाहीनी फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकला नाही. जलवाहिनी फुटून पाच दिवस झाले तरीही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे २४ तारखेपासून याभागात पाणीपुरवठाच झालेला नाही. नागरिकांना पाण्यासाठी आता भटकंती करावी लागत आहे. तब्बल पाच दिवस उलटूनदेखील मनपाकडून दुरुस्तीला किरकोळ कारणांसाठी विलंब केला जात आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जेसीबी व पाईप मिळत नसल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. मनपाकडे दुरुस्तीचे साहित्य नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच पाणी नसतांना टॅंकरची व्यवस्था करण्यात आली नाही.
गेल्या सात दिवसापासून नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी परिसरात पाण्याच्या टॅंकरसाठी वार्डाच्या नगरसेवक संगीता दांडेकर यांना संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद देण्यात आला नाही. राजू पटेल यांनी सोमवारी काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. अखेर महापौरांना विनंती केल्यावर त्यांनी या भागात टँकर पाठविला. त्यावर पाणी भरण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. कानळदा रोड भागात के.सी.पार्क,विजय नगर,त्रिभुवन कॉलनीत पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली पाईप लाईन ही नाल्यातूनच गेली आहे.तसेच याच भागात जलवाहिनी नेहमी नादुरुस्ती होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.